वाल्मिक कराडला फाशी द्या, शिवसेनेचे मुंबईत जोरदार आंदोलन

राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा


मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशी द्या,या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले. संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.त्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. शिवसेनेने वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी केली.


शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे शिवसेना महिला आघाडीकडून वाल्मिक कराडविरोधात आंदोलन करण्यात आले. वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. वाल्मिक कराड ही प्रवृत्ती आहे. काल व्हायरल झालेल्या फोटोंमधून या हत्याकांडाची भीषणता दिसून आली. अशा गोष्टी महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाण आहे. वाल्मिक कराडला केवळ शिक्षा होऊन चालणार नाही.


आरोपींना फाशी झालीच पाहिजे, ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. यासाठी राज्यभरात शिवसेना रान उठवेल, असे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या. यावेळी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी,तृष्णा विश्वासराव,संध्या वढावकर, कला शिंदे, उपनेते आनंदराव जाधव,अनिल पडवळ, युवासेना कार्यकारणी सदस्य निखिल जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून