Dhananjay Munde : "धनंजय मुंडेंनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता"- पंकजा मुंडे

  72

नागपूर : संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज, मंगळवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा द्यांनी आधीच द्यायला हवा होता. त्यापेक्षा त्यांचा राजीनामा यापूर्वीच घेतला असता तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया त्यांच्या भगिनी आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नागपुरातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर बोलत होत्या.


यासंदर्भात पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत आहे. पण हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनाम्या आधी शपथच व्हायला नको होती. तर ही गोष्ट झाली नसती. राजीनामा घेणाऱ्यांनी सुद्धा आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता असे पंकजा यांनी सांगितले.


संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही व्हिडिओ काल सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. ते व्हिडिओ उघडून पाहाण्याची सुद्धा माझी हिंमत झाली नाही. संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केलेल्यांनीच या घटनेचा व्हिडिओ केला आहे. त्या लोकांमध्ये एवढी क्रुरता आहे हे त्या व्हिडिओतून दिसत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यात मी माझी भूमिका मांडली होती. या हत्येमध्ये कोण गुंतलेले आहे, कोणाकोणाचा हात आहे, हे फक्त तपास यंत्रणांना माहित आहे. त्यामुळे मी यात हस्तक्षेप करण्याचा काही संबंध नाही.



संतोष देशमुखची हत्त्या करणाऱ्या मुलांच्या मुळे संपूर्ण राज्यातील समाजाची कुठलाही दोष नसताना नाहक बदनामी झाली आहे. संतोष देशमुख यांचा समाज सुद्दा आक्रोशात वावरत आहे. आपल्या राज्यात कुठलीही गोष्ट जातीवर जात जाते. अमानुषपणे एखाद्याला संपवणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या लोकांना कुठलीही जात नसते. गुन्हेगारांना जशी कुठली जात नसते तशीच राजकारण्यांना सुद्धा कुठली जात नसते हे लक्षात ठेवले पाहिजे असे पंकजा म्हणाल्या. तसेच या प्रकरणात कुठलाही जातीवाद होण्याचा प्रयत्न होऊ नये. मी संतोष देशमुख यांच्या आईची आणि कुटुंबीयांची हात जोडून माफी मागते. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी मागणी असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले