Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात कारची एसटी बसचा जोरदार धडक! कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू

  104




रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि चारचाकी गाडीची जोरदार धडक झाली असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. (Tamhini Ghat Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीट वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खेड-चिंचवड दिशेने जाणाऱ्या एसटी बसला बसला विळे गावाच्या दिशेकडे येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक बसली. उतार व वेग असल्यामुळे, तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती, की यामध्ये स्विफ्ट चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे. त्यामुळे कारचालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला

यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले.


दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास डकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले. तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर, एसटी मधील कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Tamhini Ghat Accident)


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या