Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात कारची एसटी बसचा जोरदार धडक! कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू




रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि चारचाकी गाडीची जोरदार धडक झाली असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. (Tamhini Ghat Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीट वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खेड-चिंचवड दिशेने जाणाऱ्या एसटी बसला बसला विळे गावाच्या दिशेकडे येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक बसली. उतार व वेग असल्यामुळे, तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती, की यामध्ये स्विफ्ट चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे. त्यामुळे कारचालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला

यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले.


दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास डकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले. तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर, एसटी मधील कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Tamhini Ghat Accident)


Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास