Nalasopara News : भावानेच घेतला चिमुकल्या बहिणीचा जीव

  36

मुंबई : सर्व नातेवाईक आपल्या बहिणीचेच लाड करतात. याचा राग डोक्यात घालून एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्या ५ वर्षीय बहिणीचा गळा दाबून डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. नालासोपाऱ्यात घडलेला हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' या ओळीला भाऊ बहिणीचं नातं छान शोभतं. भावंडांच्या नात्यात कितीही भांडण झाली तरी पुन्हा काही वेळाने गट्टी जमतेच. मात्र नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीचा जीव घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, श्री राम नगर परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाने सर्व नातेवाईक आपल्या बहिणीचेच लाड करतात हा राग डोक्यात घालून स्वतःच्या ५ वर्षीय बहिणीला डोंगरावर नेले तिथेच त्याने बहिणीचा गळा दाबून डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. मृत मुलगी खूप वेळ घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र मुलगी न सापडल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तपास केला असता मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना डोंगरावर मुलीचा मृतदेह आढळला. मात्र या चिमुकलीची कोणी आणि कशासाठी हत्या केली असेल याबद्दलचा काहीच पुरावा सापडत नव्हता.


अखेर ही चिमुकली शेवटची आरोपीसोबत दिसून आल्याने पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली. पोलिसांनी दिलेला दम, सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्याने स्वतःच तिची हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र