Kokan Cashew Industry : कोकणात काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन

दापोली : कोकणातील काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन करणे तसेच काजू प्रक्रियादार, उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आणि कोकणात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी ‘सीसीआयएफ’ या संस्थेने दापोली येथे मंथन बैठक आयोजित केली होती. या संस्थेच्या पुढाकाराने काजू उत्पादक, प्रक्रियादार यांच्या समस्या समजावून घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांमध्ये उद्यमशीलता वाढीसाठी कोकण कृषी विद्यापीठासोबत कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशनने नुकताच सामंजस्य करार केला आहे.



कोकणातील काजू उत्पादकांची सद्यस्थिती अडचणी दीर्घकालीन उपाययोजना यावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शास्त्रज्ञ प्रदीप हळदवणेकर, काजू प्रक्रिया आणि मूल्यसाखळी सल्लागार विवेक अत्रे, काजू प्रक्रिया क्लस्टर उद्योजक जयवंत ऊर्फ दादा विचारे काजू फेडरेशनचे धनंजय यादव यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत कार्डियन करेक्ट संस्थेचे रवींद्र अमृतकर आणि सहकार भारतीचे शैलेश दरगुडे सहभागी झाले होते. सहकारी शेतकरी उत्पादक संस्था आणि विविध कार्यकारी सोसायट्यांना बळकटी देऊन या समस्येवर तोडगा काढता येईल, असे शैलेश दरगुडे यांनी मत मांडले.


कोकणात रोजगार वाढीच्या संधीमध्ये वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंद असलेले छोट्या मोठ्या क्षमतेचे काजू प्रक्रिया युनिटस् पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक आहे. काजू प्रक्रिया करणाऱ्या लघुउद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषीमंत्री, पणनमंत्री, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, विभागीय आयुक्त कोकण यांच्यासमवेत धोरण निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक