IPS Officers : राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मनोज कुमार शर्मा यांची कायदा - सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती


मुंबई  : राज्य सरकारने शुक्रवारी पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, सात आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. यात तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षक पदावरून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उप महानिरीक्षक पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिली आहे.



बारावी फेल या चित्रपटामुळे चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांनाही पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची नियुक्ती कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. या बदल्यांच्या यादीत आयपीएस अधिकारी निखिल गुप्ता आणि आयपीएस अधिकारी सुरेश मेखला यांचीही नावे आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, निखिल गुप्ता सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन या विभागात कार्यरत आहेत.

Comments
Add Comment

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणार

आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था

आज मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक नाही

मुंबई : दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक २५ नोव्हेंबर रोजी होणार नाही. स्थानिक स्वराज्य