IPS Officers : राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  127

मनोज कुमार शर्मा यांची कायदा - सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती


मुंबई  : राज्य सरकारने शुक्रवारी पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, सात आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. यात तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षक पदावरून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उप महानिरीक्षक पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिली आहे.



बारावी फेल या चित्रपटामुळे चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांनाही पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची नियुक्ती कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. या बदल्यांच्या यादीत आयपीएस अधिकारी निखिल गुप्ता आणि आयपीएस अधिकारी सुरेश मेखला यांचीही नावे आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, निखिल गुप्ता सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन या विभागात कार्यरत आहेत.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत