IPS Officers : राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  100

मनोज कुमार शर्मा यांची कायदा - सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती


मुंबई  : राज्य सरकारने शुक्रवारी पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, सात आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. यात तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षक पदावरून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उप महानिरीक्षक पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिली आहे.



बारावी फेल या चित्रपटामुळे चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांनाही पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची नियुक्ती कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. या बदल्यांच्या यादीत आयपीएस अधिकारी निखिल गुप्ता आणि आयपीएस अधिकारी सुरेश मेखला यांचीही नावे आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, निखिल गुप्ता सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन या विभागात कार्यरत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.