Mumbai Crime : पाळण्याच्या दोरीने गळा आवळत जन्मदात्यानेच घेतला ४ महिन्यांच्या मुलीचा जीव!

मुंबई : 'मुलगी झाली, लक्ष्मी दारी आली' असे म्हणत असलो तरीही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आल्याने अनेकांना त्याचा तिरस्कार वाटतो. घरी वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा जन्माला यावा यासाठी अनेकजण प्रार्थना करतात. मात्र मुलगी जन्माला आल्यामुळे चिमुकलीचा जीव घेतला जाण्याच्या घटना घडल्याच्या समोर येतात. अशीच एक घटना स्मार्ट सिटी मानले जाणाऱ्या मुंबईत घडली आहे. मुलगी जन्माला आल्याच्या तिरस्काराने जन्मदात्र्यानेच पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे.



मुंबईमधील घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून पाळण्यातच अवघ्या चार महिन्यांच्या बाळाची दोरी आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली. मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्याचं लक्षात येताच नराधम बापाने हे कृत्य केले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली असून संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



नेमकं प्रकरण काय?


मुंबईतील घाटकोपरमधून संतापजनक घटना समोर आली आहे .मुलगी नको म्हणून नराधम बापाने अवघ्या चार महिन्यांच्या निष्पाप मुलीची पाळण्यातच गळा आवळून हत्या केली .घाटकोपरच्या कामराज नगर भागात संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी अटक केली . काल शनिवारी (१ मार्च) बाळाची आई काही वेळ कामानिमित्त घराबाहेर गेल्याचे लक्षात येताच संधीचा फायदा घेत संजय कोकरेने  पाळण्याच्या दोरीने आपल्या मुलीचा गळा घोटून तिला पाळण्यातच संपवले .काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर बाळ हालचाल करत नसल्याचं तिला लक्षात आलं .तिने आरडा ओरड केल्यानंतर हा प्रकार समोर आला . पोलिसांना ही बातमी कळताच घटनास्थळी धाव घेत पंतनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात