Mumbai Crime : पाळण्याच्या दोरीने गळा आवळत जन्मदात्यानेच घेतला ४ महिन्यांच्या मुलीचा जीव!

मुंबई : 'मुलगी झाली, लक्ष्मी दारी आली' असे म्हणत असलो तरीही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला आल्याने अनेकांना त्याचा तिरस्कार वाटतो. घरी वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा जन्माला यावा यासाठी अनेकजण प्रार्थना करतात. मात्र मुलगी जन्माला आल्यामुळे चिमुकलीचा जीव घेतला जाण्याच्या घटना घडल्याच्या समोर येतात. अशीच एक घटना स्मार्ट सिटी मानले जाणाऱ्या मुंबईत घडली आहे. मुलगी जन्माला आल्याच्या तिरस्काराने जन्मदात्र्यानेच पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे.



मुंबईमधील घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून पाळण्यातच अवघ्या चार महिन्यांच्या बाळाची दोरी आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली. मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्याचं लक्षात येताच नराधम बापाने हे कृत्य केले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली असून संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



नेमकं प्रकरण काय?


मुंबईतील घाटकोपरमधून संतापजनक घटना समोर आली आहे .मुलगी नको म्हणून नराधम बापाने अवघ्या चार महिन्यांच्या निष्पाप मुलीची पाळण्यातच गळा आवळून हत्या केली .घाटकोपरच्या कामराज नगर भागात संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी अटक केली . काल शनिवारी (१ मार्च) बाळाची आई काही वेळ कामानिमित्त घराबाहेर गेल्याचे लक्षात येताच संधीचा फायदा घेत संजय कोकरेने  पाळण्याच्या दोरीने आपल्या मुलीचा गळा घोटून तिला पाळण्यातच संपवले .काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर बाळ हालचाल करत नसल्याचं तिला लक्षात आलं .तिने आरडा ओरड केल्यानंतर हा प्रकार समोर आला . पोलिसांना ही बातमी कळताच घटनास्थळी धाव घेत पंतनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून