Palghar News : कंपनीच्या उच्छादामुळे स्थानिकांचा तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

वाडा : वाडा तालुक्यातील वावेघर येथील एका कंपनीच्या त्रासाला स्थानिक आदिवासी मेटाकुटीला आले असून अनेकदा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने करायचे काय असा सवाल लोकांना पडला आहे. स्थानिकांनी अखेर आपल्या कुटुंबासह वाडा तहसिलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून कार्यालयाच्या आवारात तळ ठोकला आहे. वाडा तालुक्यातील औद्योगिकीकरण लोकांच्या जीवावर उठले असून प्रदूषणकारी कारखान्यांचा उच्छादाने जनता मेटाकुटीला आली आहे. वावेघर गावातील एका कंपनीने अनेक दिवसांपासून लोकांना वेठीस धरले असून कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपुष्टात आले आहेत. बॉयलरच्या भीतीने लोकांचे जगणे अवघड झाले असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन मात्र तारीख पे तारीख देत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अखेर येथील अनेक कुटुंबांनी वाडा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात सुरक्षित स्थळी मुलाबाळांसह आपले बिऱ्हाड घेऊन शुक्रवारपासून ठिय्या मांडला आहे.



कारखान्याच्या त्रासाने मरण्यापेक्षा सरकारच्या दारात जीव गेला तर आनंद होईल अशी भावना पिडित कुटुंबांनी व्यक्त केली असून जोपर्यंत कंपनीला टाळे लागत नाही तोपर्यंत मुक्काम हलणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलकांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी