Palghar News : कंपनीच्या उच्छादामुळे स्थानिकांचा तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

वाडा : वाडा तालुक्यातील वावेघर येथील एका कंपनीच्या त्रासाला स्थानिक आदिवासी मेटाकुटीला आले असून अनेकदा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने करायचे काय असा सवाल लोकांना पडला आहे. स्थानिकांनी अखेर आपल्या कुटुंबासह वाडा तहसिलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून कार्यालयाच्या आवारात तळ ठोकला आहे. वाडा तालुक्यातील औद्योगिकीकरण लोकांच्या जीवावर उठले असून प्रदूषणकारी कारखान्यांचा उच्छादाने जनता मेटाकुटीला आली आहे. वावेघर गावातील एका कंपनीने अनेक दिवसांपासून लोकांना वेठीस धरले असून कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपुष्टात आले आहेत. बॉयलरच्या भीतीने लोकांचे जगणे अवघड झाले असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन मात्र तारीख पे तारीख देत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अखेर येथील अनेक कुटुंबांनी वाडा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात सुरक्षित स्थळी मुलाबाळांसह आपले बिऱ्हाड घेऊन शुक्रवारपासून ठिय्या मांडला आहे.



कारखान्याच्या त्रासाने मरण्यापेक्षा सरकारच्या दारात जीव गेला तर आनंद होईल अशी भावना पिडित कुटुंबांनी व्यक्त केली असून जोपर्यंत कंपनीला टाळे लागत नाही तोपर्यंत मुक्काम हलणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलकांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा