Palghar News : कंपनीच्या उच्छादामुळे स्थानिकांचा तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

वाडा : वाडा तालुक्यातील वावेघर येथील एका कंपनीच्या त्रासाला स्थानिक आदिवासी मेटाकुटीला आले असून अनेकदा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने करायचे काय असा सवाल लोकांना पडला आहे. स्थानिकांनी अखेर आपल्या कुटुंबासह वाडा तहसिलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून कार्यालयाच्या आवारात तळ ठोकला आहे. वाडा तालुक्यातील औद्योगिकीकरण लोकांच्या जीवावर उठले असून प्रदूषणकारी कारखान्यांचा उच्छादाने जनता मेटाकुटीला आली आहे. वावेघर गावातील एका कंपनीने अनेक दिवसांपासून लोकांना वेठीस धरले असून कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपुष्टात आले आहेत. बॉयलरच्या भीतीने लोकांचे जगणे अवघड झाले असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन मात्र तारीख पे तारीख देत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अखेर येथील अनेक कुटुंबांनी वाडा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात सुरक्षित स्थळी मुलाबाळांसह आपले बिऱ्हाड घेऊन शुक्रवारपासून ठिय्या मांडला आहे.



कारखान्याच्या त्रासाने मरण्यापेक्षा सरकारच्या दारात जीव गेला तर आनंद होईल अशी भावना पिडित कुटुंबांनी व्यक्त केली असून जोपर्यंत कंपनीला टाळे लागत नाही तोपर्यंत मुक्काम हलणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलकांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने