Advocates Black Coats : वकिलांना काळ्या कोटपासून ३० जूनपर्यंत सूट!

पुणे : उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून राज्यभरात नागरिकांना आता उन्हाचे (Summer) चटके जाणवू लागले आहेत. सकाळी काहीसा गारवा दर दुारी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याचे समोर येत आहे. अशातच काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वकिलांना आता काळ्या कोटपासून सुट्टी (Advocates Black Coats) दिली आहे.



वकील आणि काळा कोट हे समीकरण ठरलेलचं आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढल्यानंतर पारंपरिक पोशाखात न्यायालयीन कामकाज करणे वकील वर्गाला जवळपास अशक्य होते. काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. त्या अनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली असून, येत्या तीस जूनपर्यंत न्यायालयाने कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.


न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही उन्हाळ्यात काळ्या कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी यंदा १ मार्च ते ३० जून हे तीन महिने कोट न वापरण्याची मुभा दिली आहे.


पुरुष वकिलांसाठी ड्रेस कोड


पांढरा शर्ट, काळी किंवा राखाडी रंगाची पँट, काळा टाय किंवा पांढरा बँड असा पेहराव असणार आहे.


महिला वकिलांसाठी ड्रेस कोड


पांढरी किंवा सौम्य रंगाची साडी, सलवार कुर्ता अथवा काळी पँट, पांढऱ्या शर्टवर पांढरा पँट असा पेहराव असणार आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे