Cleanliness Drive : नारायणगाव परिसरात स्वच्छता अभियानातून काढला १४ टन कचरा!

जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचे (cleanliness drive) आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता अभियानाच्या आयोजन करण्यात आले होते. आपला परिसर स्वच्छ राहावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता यावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.



सकाळी ८ वाजून ३० मिनिटपासून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नारायणगाव परिसरातील जुना पुणे नाशिक महामार्ग, पोलीस स्टेशन, कोल्हे मळा ते बस स्थानक, ओझर रोड ते पुनम हॉटेल रोड, नेवकर पुल, खोडद रस्ता अशा एकूण सहा हजार चौरस मीटर जागेचे तसेच २१ किलोमीटर दुतर्फा रस्त्यांची स्वच्छता केली. यावेळी साधारणपणे तीन टन ओला कचरा व १३ टन सुका कचरा जमा करण्यात आला. ग्रामपंचायत मार्फत पुरवण्यात आलेल्या व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हा कचरा कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.


या स्वच्छता अभियानाच्याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, उपसरपंच बाबु पाटे, पोलीस उपनिरिक्षक जगदिश पाटील, नारायणगांव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, तसेच नारायणगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय