Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडच मास्टरमाईंड!

  64

आरोपपत्रात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्येचा एकत्रित उल्लेख


बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड (Valmik Karad) हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर येत आहे. अवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतून झालेल्या वादानंतर ही हत्या करण्यात आली, असा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात करण्यात आला आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.


दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (Santosh Deshmukh murder case) दोन महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटला असला तरी हत्येच्या कटातील आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. आरोप पत्रात फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा नंबर आठव्या क्रमांकावर आहे.


२६ फेब्रुवारी रोजी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नियुक्त केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) सीआयडी बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मिक कराडसह आठ आरोपींच्या विरोधात एक आरोप पत्र दाखल झाले. हे साधारण १४०० पानांचे आरोपपत्र असून खंडणीसह अपहरणाच्या प्रकरणात मोठे उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.



आरोपींना फरार करण्यास मदत करणारे डॉ. संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करुन यांना तात्काळ सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


पोलिसांनी सादर केलेल्या (Santosh Deshmukh murder case) आरोप पत्रात पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार हा वाल्मिक कराड आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विष्णू चाटे, तिसऱ्या क्रमांकावर सुदर्शन घुले आणि त्या खालोखाल प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे यांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींची क्रमवारी ही त्यांच्या कृत्यानुसार ठरवण्यात आली आहे. यातील प्रमुख आरोपी हा सुदर्शन घुले असून त्यानेच सरपंच देशमुख यांना जबर मारहाण केल्याचे यात उल्लेख करण्यात आला आहे. असेच संतोष देशमुख यांना घेऊन जाणारा व्यक्तीही सुदर्शन घुले होता.



खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख


Santosh Deshmukh murder case : २९ नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर सहा डिसेबरला देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला आणि मारहाण झाली. या महाराणीच्या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. त्यानंतर ९ तारखेला देशमुख यांची हत्या झाली होती. या तिन्ही प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते एकत्रित असून त्यांनी हा कट कुठे रचला, याची संपूर्ण माहिती पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागली आहे. याशिवाय देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सीआयडीकडे उपलब्ध आहे. खंडणी मागितली आणि ती न दिल्यामुळे देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे जवळजवळ उघड असल्याने ८० दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.


संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर (Santosh Deshmukh murder case) धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. स्कॉर्पिओत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते. पोलिसांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते. या घटनेचा ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. घटना घडल्यानंतर देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्यात यावी.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक