Nashik News : शेअर मार्केटमध्ये नुकसान, युवकाने घेतले स्वतःला जाळून

नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे एका युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उलाढाल सुरू आहे शेअर बाजार हा दिवसेंदिवस खाली उतरत आहे त्यामुळे नाशिक शहरात राहत असलेला आणि मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहत असलेला राजेंद्र शिवाजी कोल्हे या ३० वर्षीय युवकाने शेअर बाजारामध्ये सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.



नाशिकमध्ये नोकरी करून आई-वडिलांना पैसे न देता ते शेअर बाजारामध्ये अडकविले वेळप्रसंगी आपल्या मित्र मंडळा कडून पैसे घेऊन ते शेअर बाजारामध्ये अडकविले परंतु शेअर बाजारामध्ये दिवसेंदिवस नुकसान होत गेल्याने हा युवक हतबल झाला होता अखेर या युवकाने महाशिवरात्रीच्या दिवशी त्रंबकेश्वर येथे जाऊन त्रंबकेश्वर चे दर्शन घेतले आणि येताना पिंपळगाव बहुला या ठिकाणी असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये आपली दुचाकी घेऊन जाऊन ती सर्वप्रथम पेटवली आणि अंगावरती पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतले पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये राजेंद्र कोल्हे याला दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्याचे शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल