Bird Flu : बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव! १८ मांजरींसह ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू

  81

छिंदवाडा : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बर्ड फ्लूचा शिरकाव वाढत चालला आहे. रायगड व लातूरनंतर विदर्भ आणि मध्य प्रदेशातून बर्ड फ्लूच्या (Bird flu) धोक्याच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे १८ मांजरींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर विदर्भातून ६ हजारहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूच्या वाढत्या घटनेमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून अलर्ट जारी केला आहे.



१८ पाळीव मांजरांचा मृत्यू


मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १८ पाळीव मांजरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर CMHO ने तात्काळ एक विशेष टीम तयार केली. तसेच बर्ड फ्लूच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. (Bird Flu)



विदर्भात ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू


विदर्भात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर अकोला येथील प्रयोगशाळेकडून येथील मृत पक्ष्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानकडे पाठविले. तेथून हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेच्या तपासणीत कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाले.



मटण आणि चिकन दुकाने सील


बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी करत मांस, चिकन आणि अंडी खरेदी-विक्रीवर ३० दिवसांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, बर्ड फ्लूच्या प्रभावी क्षेत्रांमधील सर्व मटण आणि चिकन दुकाने सील करण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे रोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांना सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. (Bird Flu)

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती