ATM robbers : दुस-यांदा एटीएम फोडणारे मध्य प्रदेशातून झाले पसार?

  41

एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या शोधात पोलीस 'एमपी' पर्यंत पोहचले


अमरावती : तिवसा शहरात महामार्गावर असलेले एटीएम फोडून ४ लाख ८० हजारांची रोख लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी (ATM robbers) एटीएम जाळून टाकले. या चोरट्यांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांचे पाच पथक कार्यरत आहे. या पथकांनी आतापर्यंत सुमारे ७० ते ८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यामधून चोरट्यांनी पांढऱ्या रंगाची कार वापरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, चोरटे मध्य प्रदेश मार्गे समोर पळाल्याचा संशय आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत.



चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज


ग्रामीण पोलिसांच्या पथकाने (ATM robbers) वरुड, नागपूर या दोन्ही मार्गे असलेले सीसीटीव्ही तपासले आहेत. चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज आहे. त्याच आधारे गुरुवारी (दि. २७) एलसीबीचे दोन पथक मध्य प्रदेशात पोहोचले आहे. बैतुलमध्येही एका ठिकाणी कार सीसीटीव्हीत दिसली मात्र कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये कारचा क्रमांक कैद झाला नाही. त्यामुळे कार कुठली आहे किंवा चोरटे कुठले आहेत, याबाबत ठोस माहिती पोलिसांना अद्याप प्राप्त झाली नाही.



मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी फोडले होते


दरम्यान मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी (ATM robbers) फोडले होते. ते चोरटेही वरुड, मध्य प्रदेश मार्गेच हरियाणाला गेले होते. ते चोरटे हरियाणाचे होते. मात्र त्या टोळीतील एकच चोरटा आणि चोरट्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेल्या कारचा मालक असे दोघेच पोलिसांच्या हाती आले होते. पुन्हा त्याच भागातील चोरट्यांनी ही चोरी केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक