ATM robbers : दुस-यांदा एटीएम फोडणारे मध्य प्रदेशातून झाले पसार?

एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या शोधात पोलीस 'एमपी' पर्यंत पोहचले


अमरावती : तिवसा शहरात महामार्गावर असलेले एटीएम फोडून ४ लाख ८० हजारांची रोख लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी (ATM robbers) एटीएम जाळून टाकले. या चोरट्यांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांचे पाच पथक कार्यरत आहे. या पथकांनी आतापर्यंत सुमारे ७० ते ८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यामधून चोरट्यांनी पांढऱ्या रंगाची कार वापरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, चोरटे मध्य प्रदेश मार्गे समोर पळाल्याचा संशय आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत.



चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज


ग्रामीण पोलिसांच्या पथकाने (ATM robbers) वरुड, नागपूर या दोन्ही मार्गे असलेले सीसीटीव्ही तपासले आहेत. चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज आहे. त्याच आधारे गुरुवारी (दि. २७) एलसीबीचे दोन पथक मध्य प्रदेशात पोहोचले आहे. बैतुलमध्येही एका ठिकाणी कार सीसीटीव्हीत दिसली मात्र कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये कारचा क्रमांक कैद झाला नाही. त्यामुळे कार कुठली आहे किंवा चोरटे कुठले आहेत, याबाबत ठोस माहिती पोलिसांना अद्याप प्राप्त झाली नाही.



मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी फोडले होते


दरम्यान मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी (ATM robbers) फोडले होते. ते चोरटेही वरुड, मध्य प्रदेश मार्गेच हरियाणाला गेले होते. ते चोरटे हरियाणाचे होते. मात्र त्या टोळीतील एकच चोरटा आणि चोरट्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेल्या कारचा मालक असे दोघेच पोलिसांच्या हाती आले होते. पुन्हा त्याच भागातील चोरट्यांनी ही चोरी केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री