Maharashtra Weather : मार्च महिन्यात तापमान वाढीची शक्यता

  84

नवी दिल्ली : यंदा मार्च महिन्यात इतर वर्षांच्या तुलनेत अधिक उष्णतेची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने आज, शुक्रवारी दिली. भारतीय हवामान विभागाने या वर्षीतील मार्च महिना सर्वात उष्ण असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवसाचे तापमान वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर अनेक राज्यांमध्ये महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस (१०४° फॅरेनहाइट) पेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांने सांगितले.

उत्तर आणि मध्य भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये मार्चच्या मध्यापासून तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. सामान्यपेक्षा ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमधील हवामान गहू, हरभरा आणि रेपसीड पिकांसाठी अनुकूल राहणार नाही, कारण त्यांना उष्णतेच्या ताणाचा सामना करावा लागू शकतो इशारा त्यांनी दिला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लागवड केलेली ही हिवाळी पिके त्यांच्या वाढीच्या चक्रात थंड तापमानावर अवलंबून असतात आणि त्यामुळे चांगले उत्पादन मिळते.



जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश म्हणून, २०२२ पासून सलग ३ वर्षे खराब पीक घेतल्यानंतर महागड्या आयातीची गरज टाळण्यासाठी भारत २०२५ मध्ये भरपूर पीक घेण्याची आशा करत आहे. तथापि, जास्त उष्णतेमुळे सलग चौथ्या वर्षी उत्पादन कमी होऊ शकते, ज्यामुळे सरकार आयातीला परवानगी देण्यासाठी आणि पुरवठ्याची कमतरता कमी करण्यासाठी विद्यमान ४० टक्के आयात कर कमी करू शकते अथवा तो हटवू शकते.
Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली