इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी

कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना केशव वैद्य या नावाने शुक्रवारी दुपारी पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. इंद्रजीत सावंत यांना त्यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करण्यात येईल, असेही म्हटले आहे. केशव वैद्य यांच्या कमेंट बॉक्समध्ये धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे.


नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने चार दिवसापूर्वी इंद्रजीत सावंत यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्रात गदारोळ माजलेला असतानाच आणि संशयित कोरटकर यांच्या शोधासाठी राज्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असताना शुक्रवारी दुपारी पुन्हा इंद्रजीत सावंत यांना केशव वैद्य या नावाने धमकाविण्यात आले आहे.



फार काही दिवस नाही. पण लवकरच घरात घुसून इंद्रजीत सावंत यांचा खात्मा केला जाईल, असे त्यात म्हटले आहे. या धमकीमुळे कोल्हापूरसह परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. इंद्रजीत सावंत यांनी दुपारी वकिलांची भेट घेतली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच