पुणे : धक्कादायक! पुणे जिल्ह्यातून दररोज १४ महिला बेपत्ता

पुणे : एकीकडे शहरात बलात्काराच्या घटनांमुळे महिला खरेच किती सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असताना, शहरातून महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. १ जानेवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यानच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातून (पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण) तब्बल ७६७ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.


पुणे जिल्ह्याचा मोठा विस्तार आहे. तसेच, पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहर या दोन महत्त्वाच्या महानगरांचा समावेश या जिल्ह्यात आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांबरोबरच परप्रांतियांचा देखील मोठा ओढा या शहरांकडे आहे.



पुणे शहरातून २४३, पिंपरी- चिंचवडमधून २७१ तर पुणे ग्रामीणमधून २५३ महिला आणि तरुणी बेपत्ता झाली आहे. या बेपत्ता महिलांचा विचार केला, तर दिवसाला सुमारे चौदा तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसून येते. काही बेपत्ता घटनांच्या नोंदीमध्ये काही महिला पुन्हा घरी परतल्याची माहिती आहे. परंतु, अनेक महिलांचा अद्यापही पत्ता लागला नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,