पुणे : धक्कादायक! पुणे जिल्ह्यातून दररोज १४ महिला बेपत्ता

  57

पुणे : एकीकडे शहरात बलात्काराच्या घटनांमुळे महिला खरेच किती सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असताना, शहरातून महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. १ जानेवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यानच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातून (पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण) तब्बल ७६७ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.


पुणे जिल्ह्याचा मोठा विस्तार आहे. तसेच, पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहर या दोन महत्त्वाच्या महानगरांचा समावेश या जिल्ह्यात आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांबरोबरच परप्रांतियांचा देखील मोठा ओढा या शहरांकडे आहे.



पुणे शहरातून २४३, पिंपरी- चिंचवडमधून २७१ तर पुणे ग्रामीणमधून २५३ महिला आणि तरुणी बेपत्ता झाली आहे. या बेपत्ता महिलांचा विचार केला, तर दिवसाला सुमारे चौदा तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसून येते. काही बेपत्ता घटनांच्या नोंदीमध्ये काही महिला पुन्हा घरी परतल्याची माहिती आहे. परंतु, अनेक महिलांचा अद्यापही पत्ता लागला नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष ट्रेनचा 9 जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव ट्रेनला मुंबईत हिरवा झेंडा  मुंबई: महाराष्ट्र शासन आणि भारतीय

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

Wild Vegetables: पावसामुळे यंदा रानभाज्यांचे लवकर आगमन, ग्राहकांची मागणी

जिल्ह्यातील अनेक बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात  दिंडोरी:  सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर,

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादानंतर

99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)