पुणे : धक्कादायक! पुणे जिल्ह्यातून दररोज १४ महिला बेपत्ता

  82

पुणे : एकीकडे शहरात बलात्काराच्या घटनांमुळे महिला खरेच किती सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असताना, शहरातून महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. १ जानेवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यानच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातून (पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण) तब्बल ७६७ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.


पुणे जिल्ह्याचा मोठा विस्तार आहे. तसेच, पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहर या दोन महत्त्वाच्या महानगरांचा समावेश या जिल्ह्यात आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांबरोबरच परप्रांतियांचा देखील मोठा ओढा या शहरांकडे आहे.



पुणे शहरातून २४३, पिंपरी- चिंचवडमधून २७१ तर पुणे ग्रामीणमधून २५३ महिला आणि तरुणी बेपत्ता झाली आहे. या बेपत्ता महिलांचा विचार केला, तर दिवसाला सुमारे चौदा तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसून येते. काही बेपत्ता घटनांच्या नोंदीमध्ये काही महिला पुन्हा घरी परतल्याची माहिती आहे. परंतु, अनेक महिलांचा अद्यापही पत्ता लागला नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.

Comments
Add Comment

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक