पुणे : धक्कादायक! पुणे जिल्ह्यातून दररोज १४ महिला बेपत्ता

  69

पुणे : एकीकडे शहरात बलात्काराच्या घटनांमुळे महिला खरेच किती सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असताना, शहरातून महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. १ जानेवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यानच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातून (पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण) तब्बल ७६७ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.


पुणे जिल्ह्याचा मोठा विस्तार आहे. तसेच, पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहर या दोन महत्त्वाच्या महानगरांचा समावेश या जिल्ह्यात आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांबरोबरच परप्रांतियांचा देखील मोठा ओढा या शहरांकडे आहे.



पुणे शहरातून २४३, पिंपरी- चिंचवडमधून २७१ तर पुणे ग्रामीणमधून २५३ महिला आणि तरुणी बेपत्ता झाली आहे. या बेपत्ता महिलांचा विचार केला, तर दिवसाला सुमारे चौदा तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसून येते. काही बेपत्ता घटनांच्या नोंदीमध्ये काही महिला पुन्हा घरी परतल्याची माहिती आहे. परंतु, अनेक महिलांचा अद्यापही पत्ता लागला नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या