वीज कर्मचाऱ्यांचा पी.एफ. ट्रस्ट धोक्यात!

कल्याण : राज्यातील तिनही वीज कंपन्यांतील (Electricity) किमान नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र चालविला जाणारा तेरा हजार कोटीचा पी. एफ. ट्रस्ट (PF trust) भ्रष्ट विश्वास्तांमुळे धोक्यात आला आहे. मितीला सदर ट्रस्ट चा तोटा हा जवळपास दोन हजार कोटीच्या घरात असून, तो दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे वीज कंपन्यांतील नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबे उघड्यावर पडण्याच्या भीतीने हवालदिल झाली आहेत.



महिना अखेर पगारापोटी कपात होऊन येणारी पी.एफ. ची रक्कम ही योग्य व आर.पी.एफ.सी. च्या नियमात बसणाऱ्या सक्षम वित्तीय संस्थेत न गुंतवल्याने हा तोटा होत आहे. याला वीज प्रशासन व सहा वीज कामगार संघटनांचे मनमानी गुंतवणूक करणारे विश्वस्त जबाबदार आहेत. या विश्वस्तांनी जाणून बुजून केलेल्या अक्षम्य चूकीमुळे हे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या विश्वास्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.


ज्या वित्तीय संस्था आरपीएफसीने घालून दिलेल्या गुंतवणुकी संबंधीच्या नियमात बसत नव्हत्या, या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबाची भविष्याची ठेव, जाणून बुजून ट्रस्टच्या विश्वस्तांनी या कंपन्यांमध्ये गुंतविली आहे. यात सरळ भ्रष्टाचार दिसत असल्याने संबंधित विश्वास्तांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे झाले आहे. या विश्वस्तांच्या कारभाराबाबत संघटनेचा व वीज कामगारांचा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे हि ट्रस्ट ईपीएफओला जॉईन करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा नव्वद हजार वीज कामगारांची कुटुंबे आपल्या भविष्यासाठीची बचत गमावून बसतील. याविरूध्द आमदार भाई जगताप लवकरच येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत.

Comments
Add Comment

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची