वीज कर्मचाऱ्यांचा पी.एफ. ट्रस्ट धोक्यात!

  36

कल्याण : राज्यातील तिनही वीज कंपन्यांतील (Electricity) किमान नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र चालविला जाणारा तेरा हजार कोटीचा पी. एफ. ट्रस्ट (PF trust) भ्रष्ट विश्वास्तांमुळे धोक्यात आला आहे. मितीला सदर ट्रस्ट चा तोटा हा जवळपास दोन हजार कोटीच्या घरात असून, तो दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे वीज कंपन्यांतील नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबे उघड्यावर पडण्याच्या भीतीने हवालदिल झाली आहेत.



महिना अखेर पगारापोटी कपात होऊन येणारी पी.एफ. ची रक्कम ही योग्य व आर.पी.एफ.सी. च्या नियमात बसणाऱ्या सक्षम वित्तीय संस्थेत न गुंतवल्याने हा तोटा होत आहे. याला वीज प्रशासन व सहा वीज कामगार संघटनांचे मनमानी गुंतवणूक करणारे विश्वस्त जबाबदार आहेत. या विश्वस्तांनी जाणून बुजून केलेल्या अक्षम्य चूकीमुळे हे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या विश्वास्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.


ज्या वित्तीय संस्था आरपीएफसीने घालून दिलेल्या गुंतवणुकी संबंधीच्या नियमात बसत नव्हत्या, या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबाची भविष्याची ठेव, जाणून बुजून ट्रस्टच्या विश्वस्तांनी या कंपन्यांमध्ये गुंतविली आहे. यात सरळ भ्रष्टाचार दिसत असल्याने संबंधित विश्वास्तांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे झाले आहे. या विश्वस्तांच्या कारभाराबाबत संघटनेचा व वीज कामगारांचा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे हि ट्रस्ट ईपीएफओला जॉईन करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा नव्वद हजार वीज कामगारांची कुटुंबे आपल्या भविष्यासाठीची बचत गमावून बसतील. याविरूध्द आमदार भाई जगताप लवकरच येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.