रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह नव्या स्वरूपात, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 'नूतनीकृत अकादमी संकुलाचा' उद्घाटन समारंभ शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी, सकाळी ११:३० वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग असलेल्या रवींद्र नाट्यमंदिर, लघु नाट्यगृह आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.


कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री शमंगल प्रभात लोढा , सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत हे सुद्धा उपस्थित असतील. त्याचबरोबर कला क्षेत्रातील दिग्गजांची सुद्धा उपस्थिती सदर सोहळ्यास लाभणार आहे.

उद्घाटन सोहळ्यात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, नंदेश उमप, रोहन पाटील सादरीकरण करणार आहेत.

असे असेल रवींद्र नाट्य मंदिराचे नवे स्वरूप!


नाट्यगृहाच्या जुन्या इमारतीत आधुनिक सुविधा देत नवीन अंतर्गत सजावट व तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अधिक आरामदायक खुर्च्या, प्रगत ध्वनी यंत्रणा व प्रकाश योजना आणि सर्व सोयी सुविधांनीयुक्त रंगपट आले आहेत. अत्याधुनिक परिषद सभागृह, खुले नाट्यगृह, नॅनो सभागृह, ऑडिओ-विज्युअल स्टुडिओ आणि एडिटिंग सुट्स नव्याने उभारण्यात आले आहेत. लघु नाट्यगृहात डॉल्बी ॲटमॉस ध्वनी यंत्रणा,चित्रपट प्रदर्शन व्यवस्था, करण्यात आली असून अकादमीत वादन कक्ष आणि सृजनकक्षही विकसित करण्यात आले आहेत. तसेच पु. ल. देशपांडे यांचे स्मृतिदालन देखील सुरु करण्यात येणार आहे.


या सुधारित सुविधांमुळे कलाकारांना अधिक प्रेरणादायी आणि सुसज्ज वातावरण मिळेल. प्रेक्षकांचा अनुभव अधिक दर्जेदार व आनंददायक होईल. विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन सहज शक्य होईल. निर्मिती आणि प्रयोगशीलतेला चालना मिळेल, ज्यामुळे नवोदित आणि अनुभवी कलाकारांना आपल्या कलेचा विकास करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. विचारमंथन, प्रशिक्षण आणि सादरीकरणासाठी एक आदर्श मंच निर्माण होईल, जो कला क्षेत्राच्या प्रगतीस मोठा हातभार लावेल.

पु. ल. आता बंगालीत!


रवींद्र नाट्यमंदिर येथे नूतनीकरणानंतर प्रथमच १ मार्च २०२५ रोजी एक दिवसीय पु. ल. महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध भाषांत पु. ल. देशपांडे यांचे साहित्य प्रसारित व्हावे, या उद्देशाने सदर महोत्सवात बंगाली भाषेत 'आमार देखा किचू नमुना' हे नाटक सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या अतिशय लोकप्रिय 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकातील काही व्यक्तिरेखांवर आधारित हा नाट्याविष्कार रुपांगगण फाउंडेशन सादर करणार असून प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळा अनुभव ठरेल. तसेच या दिवशी पार्थ थिएटर्स, मुंबई तर्फे पु. ल. देशपांडे यांनी लिहलेले 'मॅड सखाराम' हे नाटक सुद्धा सादर केले जाणार आहे.


दि. २ मार्च रोजी येथे 'महिला कला महोत्सव' आयोजित केला जाणार असून, या कार्यक्रमात लावणी आणि शास्त्रीय युगलगायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रेश्मा मुसळेकर आणि संच मिळून लावणी नृत्य कार्यक्रम सादर करतील आणि विदुषी अपूर्व गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी यांचे शास्त्रीय गायन प्रेक्षकांना ऐकण्यास मिळेल.

प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे
Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर