“हिंदीमुळे २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्या”

चेन्नई : हिंदी भाषा जबरदस्तीने लादल्यामुळे गेल्या १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्याचा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आज, गुरुवारी केला.


यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या एका पोस्टमध्ये स्टॅलिन म्हणाले की, एकाधिकारशाही हिंदी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्राचीन भाषांना मारत आहे.


उत्तर प्रदेश आणि बिहार हे कधीच हिंदी पट्टे नव्हते. आता त्यांच्या मूळ भाषा भूतकाळाचे अवशेष बनल्या आहेत.



इतर राज्यातील माझ्या प्रिय बहिणी आणि बंधूंनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की, हिंदीने किती भारतीय भाषा गिळंकृत केल्या आहेत?


भोजपुरी, मैथिली, अवधी, ब्रज, बुंदेली, गढवाली, कुमाऊनी, मगही, मारवाडी, मालवी, छत्तीसगढी, संथाली, अंगिका, हो, खारिया, खोरथा, कुर्मली, कुरुख, मुंडारी आणि इतर अनेक भाषा आता जगण्यासाठी धडपडत आहेत, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.


दरम्यान, भाजपाने स्टॅलिन यांचे विधान मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला