‘छावा’तील सोयराबाईंच्या डिलीटेड सीनची चर्चा

Share

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या छावा चित्रपटाने ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. सुपरहिट झालेल्या या चित्रपटातील एका डिलीटेड सीनची माहिती प्रसारमाध्यमांच्या हाती आली आहे. सोशल मीडियातही या सीनची चर्चा सुरू झाली आहे.

‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळी त्यात छत्रपती संभाजी महाराज आणि पत्नीसह लेझीम नृत्य करत असल्याचे एक दृश्य होते. या दृश्यावरुन आक्षेप घेण्यात आले. अखेर नागरिकांच्या भावनांचा मान राखत चित्रपटातून वादाचे कारण ठरलेले लेझीम नृ्त्य काढण्यात आले. यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्साहवर्धक वातावरणात अचानक ‘छावा’ चित्रपटातील राजमाता सोयराबाईंच्या एका डिलीटेड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

राजमाता सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांच्यात एक संवाद होताना दिसत आहे. अभिनेता आशुतोष राणा हा हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री दिव्या दत्ता राजमाता सोयराबाई यांच्या भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलाला म्हणजेच अकबरला भेटल्यानंतरचे हे दृश्य आहे. यात हंबीरराव हे सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करुन देतात. यानंतर ते सोयराबाईंच्या उद्दिष्टांबाबत प्रश्न उपस्थित करतात. हा संवाद मनाचा ठाव घेतो. याच कारणामुळे हा सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियात या सीनची चर्चा सुरू आहे. दमदार अभिनय, अप्रतिम संवाद… असे असूनही हा संवाद चित्रपटातून का वगळला ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

5 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

26 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

58 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago