'छावा'तील सोयराबाईंच्या डिलीटेड सीनची चर्चा

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या छावा चित्रपटाने ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. सुपरहिट झालेल्या या चित्रपटातील एका डिलीटेड सीनची माहिती प्रसारमाध्यमांच्या हाती आली आहे. सोशल मीडियातही या सीनची चर्चा सुरू झाली आहे.





'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळी त्यात छत्रपती संभाजी महाराज आणि पत्नीसह लेझीम नृत्य करत असल्याचे एक दृश्य होते. या दृश्यावरुन आक्षेप घेण्यात आले. अखेर नागरिकांच्या भावनांचा मान राखत चित्रपटातून वादाचे कारण ठरलेले लेझीम नृ्त्य काढण्यात आले. यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्साहवर्धक वातावरणात अचानक 'छावा' चित्रपटातील राजमाता सोयराबाईंच्या एका डिलीटेड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.



राजमाता सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांच्यात एक संवाद होताना दिसत आहे. अभिनेता आशुतोष राणा हा हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री दिव्या दत्ता राजमाता सोयराबाई यांच्या भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलाला म्हणजेच अकबरला भेटल्यानंतरचे हे दृश्य आहे. यात हंबीरराव हे सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करुन देतात. यानंतर ते सोयराबाईंच्या उद्दिष्टांबाबत प्रश्न उपस्थित करतात. हा संवाद मनाचा ठाव घेतो. याच कारणामुळे हा सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियात या सीनची चर्चा सुरू आहे. दमदार अभिनय, अप्रतिम संवाद... असे असूनही हा संवाद चित्रपटातून का वगळला ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.
Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय