Assam Earthquake : आसाम हादरलं! अनेक ठिकाणी बसले भूकंपाचे धक्के

दिसपूर : आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के (Assam Earthquake) जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० इतकी मोजली गेली. गुवाहाटी आणि राज्याच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, रात्री २ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास हा भूकंप झाला. आसाम देशातील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक असून त्याचा सिस्मिक झोन ५ मध्ये समावेश होतो.



आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचा प्रभाव दिसून आला. गुवाहाटी, नागाव आणि तेजपूरमध्ये लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. सोशल मीडियावर अनेकांनी जोरदार भूकंप जाणवल्याचा उल्लेख केला आहे. भूकंपामुळे घरातील पंखे आणि खिडक्या थरथरू लागल्या. काही भागात लोक घराबाहेर पडले. गेल्या काही वर्षांत या भागात अनेक मोठे भूकंप झाले आहेत.


दरम्यान आसाममधील भूकंपाच्या २ दिवस आधी बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के बसले होते. बंगालच्या उपसागरात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ मोजण्यात आली होती. हा भूकंप २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी झाला होता. बंगालच्या उपसागरात ते ९१ किलोमीटर खोलवर हा भूकंप झाल्याचे एनसीएसने म्हंटले आहे.

Comments
Add Comment

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक