केडीएमसीच्या आय प्रभागात अनधिकृत बांधकामप्रकरणी एमआरटीपी गुन्हा दाखल!

  59

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील ६५ इमारतींचा रेरा प्रश्न आणि अनधिकृत बांधकाम प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मनपाचे पुरते वाभाडे निघाले असल्याचे चित्र दिसत असताना, केडीएमसीच्या आय प्रभागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अधिक्षक यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफिया, चाळ माफियांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत आहे.



केडीएमसी आय प्रभागाचे अधिक्षक शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आय प्रभागात बांधकामधारक बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे यांचे श्रीमलंगरोड, पुंडलिक म्हात्रे शाळेच्या मागे मौजे वसार डावलपाडा येथे बेकायदेशीर चाळींचे बांधकाम करत असल्याबाबत कागदपत्रे सादर करण्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,१९४९चे कलम २६० व २६७ (१) अन्वये जा.क्र.कडोंमपा/ ९ आयप्रक्षे/अबांनि/५३६, दिनांक २७/१२/२०२४ रोजी नोटीस देण्यात आली होती; परंतु बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे यांनी बांधकाम अधिकृततेबाबत कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.


त्यानंतर तसेच त्यांनी बांधकाम काढून टाकले नसल्याचे १८फेब्रुवारी २०२५ रोजी संदर्भीत बांधकाम ठिकाणी अधिक्षक जाधव आणि सहकारी गेले असता श्रीमलंगरोड, पुंडलिक म्हात्रे शाळेच्या मागे मौजे वसार डावलपाडा येथे जाऊन समक्ष पाहणी केली असता, त्याठिकाणी अनधिकृत बांधलेल्या चाळीचे बांधकाम काढून टाकलेले नसल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे या बांधकाम धारकांवर विनापरवाना अनधिकृतपणे चाळीचे बांधकाम केल्याने एमआरटीपी अंतर्गत हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.