Pune Airport : पुणे विमानतळावर ३.५ कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त

पुणे : तस्करांनी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या तीन विद्यार्थ्यांचा वापर करून ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे परकीय चलन पुणे विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने १७ फेब्रुवारी रोजी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या स्पाइस जेटच्या विमानातून दोन ट्रॉली बॅगमध्ये परकीय चलन भारतातून तस्करी केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशांना परत बोलावून घेतले. त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सामानातून तीन कोटी ४७ लाख रुपये (सुमारे चार लाख अमेरिकन डॉलर्स) जप्त केले.



चौकशीदरम्यान, विद्यार्थ्यांनी सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सांगितले की, या बॅगा पुण्यातील ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल यांनी दिल्या होत्या. खुशबू अग्रवाल हिने या तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या दुबई ट्रिपसाठी पॅकेज दिले होते. पुण्याहून निघण्यापूर्वी शेवटच्या क्षणी तिने विद्यार्थ्यांना दोन बॅगा दिल्या. त्यामध्ये कार्यालयीन कागदपत्रे असून, ती दुबईच्या कार्यालयात तातडीने द्यावयाची असल्याचे सांगितले. चांगल्या हेतूने या विद्यार्थ्यांनी बॅगा घेऊन पुण्याहून निघून गेले. परंतु तस्करीची माहिती मिळताच सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करून त्या प्रवाशांना दुबईवरून परत बोलावून सामानाची झडती घेतली.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू