Pushpa 2 : ‘पुष्पा’चा शालेय विद्यार्थ्यांवर वाईट प्रभाव! शिक्षिकेची आयोगाकडे तक्रार

  46

हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा २ : द रुल’ (Pushpa 2 : the rule) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र हैदराबादमधील युसुफगुडा इथल्या एका सरकारी शाळेतील शिक्षक चित्रपटावर नाराज आहेत. हैदराबादमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांवर ‘पुष्पा’चा वाईट प्रभाव पडत असल्याचे म्हटले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, 'शाळेतली मुलं विचित्र हेअरस्टाइल करतात, अश्लील बोलतात. आपण फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतोय आणि याकडे दुर्लक्ष करतोय. ही परिस्थिती केवळ सरकारी शाळांमध्येच नाही तर खाजगी शाळांमध्येही आहे. प्रशासक म्हणून मला असं वाटतं की मी अपयशी ठरत आहे', अशी तक्रार शिक्षिकेने बोलून दाखवली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याने त्यांच्यावर दबाव येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.


त्याचबरोबर 'आम्ही त्यांच्या पालकांना या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलं तरीही त्यांना काही वाटत नाही. तुम्ही त्यांनी शिक्षादेखील करू शकत नाही, कारण त्यामुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा दोष मी मास मीडियाला देते. पुष्पासारख्या चित्रपटामुळे माझ्या शाळेतील अर्धे विद्यार्थी आणखी बिघडले आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल याचा कोणताही विचार न करता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं आहे', अशी टीका संबंधित शिक्षिकेने केली आहे.


दरम्यान, शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘शिक्षिकेनं बरोबर म्हटलंय. अशा प्रकारच्या चित्रपटांचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो’, असं एकाने म्हटलंय. तर ‘तुम्ही काही चांगलं बोलू शकत नसाल तर ठीक आहे. पण किमान आणखी वाईट तरी बोलू नका’, असे एका ‘पुष्पा’च्या चाहत्याने कमेंट केले आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित