Pink E-Rickshaw : अमरावती ई पिंक- रिक्षासाठी केवळ २९३ महिला ठरल्यात पात्र

  119

अमरावती : महिला सक्षमीकरण व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, या संकल्पनेतून महिलांसाठी असलेल्या ई-पिंक रिक्षा योजनेस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट असताना केवळ २९३ लाभार्थी महिलांचे अर्ज आले आहेत. उद्दिष्टपूर्ती कशी करावी, असा प्रश्न त्यामुळे महिला व बालविकास विभागासमोर उभा झाला आहे.


खास महिलांसाठी २०२४ मध्ये ई-पिंक रिक्षाची योजना राज्य सरकारने महिला व बालविकास विभागामार्फत लागू केली आहे. २.७८ लाख रुपये किमतीचा एक ई-पिंक रिक्षा लाभार्थ्याला एकूण रकमेच्या ७० टक्के कर्जावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभाथ्यनि स्वतःचा हिस्सा १० टक्के द्यायचा असून, २० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. लाभार्थ्यांना ८० हजार रुपयांची सबसिडी मिळणार आहे.जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यामध्ये अमरावती शहरासाठी ३०० व ग्रामीण शहरी भागासाठी ३००, अशी उद्दिष्टांची विभागणी करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी लागू झालेल्या या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातून २९३ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यास मंजुरी देण्यात आल्याचे महिला व बालविकास अधिकारी टेकाळे यांनी सांगितले.



लाभार्थी महिलांना ७० टक्के कर्ज विविध बँकांकडून मिळवून देण्यासाठी उत्पादक कंपनी स्वतः प्रयत्न करणार आहे. या कंपनीची चमू येणार असून ती बँकांसोबत करार करून कर्ज उपलब्ध करून देतील. यासाठी महिला लाभार्थ्यांचे सिबिल तपासण्यात येणार आहे. या रिक्षा शहरातील कोणत्या मार्गावर चालवण्यात याव्यात, ते प्रादेशिक - परिवहन विभागाकडून निश्चित - करण्यात येणार आहे. ई-रिक्षांसाठी - चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असले तरी त्यासाठी अद्याप जागेची निवड करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ