Pink E-Rickshaw : अमरावती ई पिंक- रिक्षासाठी केवळ २९३ महिला ठरल्यात पात्र

अमरावती : महिला सक्षमीकरण व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, या संकल्पनेतून महिलांसाठी असलेल्या ई-पिंक रिक्षा योजनेस प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट असताना केवळ २९३ लाभार्थी महिलांचे अर्ज आले आहेत. उद्दिष्टपूर्ती कशी करावी, असा प्रश्न त्यामुळे महिला व बालविकास विभागासमोर उभा झाला आहे.


खास महिलांसाठी २०२४ मध्ये ई-पिंक रिक्षाची योजना राज्य सरकारने महिला व बालविकास विभागामार्फत लागू केली आहे. २.७८ लाख रुपये किमतीचा एक ई-पिंक रिक्षा लाभार्थ्याला एकूण रकमेच्या ७० टक्के कर्जावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाभाथ्यनि स्वतःचा हिस्सा १० टक्के द्यायचा असून, २० टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे. लाभार्थ्यांना ८० हजार रुपयांची सबसिडी मिळणार आहे.जिल्ह्यासाठी ६०० रिक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यामध्ये अमरावती शहरासाठी ३०० व ग्रामीण शहरी भागासाठी ३००, अशी उद्दिष्टांची विभागणी करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी लागू झालेल्या या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातून २९३ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यास मंजुरी देण्यात आल्याचे महिला व बालविकास अधिकारी टेकाळे यांनी सांगितले.



लाभार्थी महिलांना ७० टक्के कर्ज विविध बँकांकडून मिळवून देण्यासाठी उत्पादक कंपनी स्वतः प्रयत्न करणार आहे. या कंपनीची चमू येणार असून ती बँकांसोबत करार करून कर्ज उपलब्ध करून देतील. यासाठी महिला लाभार्थ्यांचे सिबिल तपासण्यात येणार आहे. या रिक्षा शहरातील कोणत्या मार्गावर चालवण्यात याव्यात, ते प्रादेशिक - परिवहन विभागाकडून निश्चित - करण्यात येणार आहे. ई-रिक्षांसाठी - चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असले तरी त्यासाठी अद्याप जागेची निवड करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे