Bandhan Bank : बंधन बँकेने महाराष्ट्रात सुरू केल्या २ नवीन शाखा

मुंबई : बंधन बँकेने आज तीन राज्यांमध्ये ९ नवीन शाखा सुरू केल्याची घोषणा केली. महाराष्ट्रात २, उत्तर प्रदेशात ६ आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे १ नवीन शाखा कार्यान्वित करण्यात आली. बंधन बँकेचे एमडी आणि सीईओ श्री. पार्थ प्रतिम सेनगुप्ता यांनी कार्यकारी संचालक श्री. राजिंदर कुमार बब्बर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कोलकाता येथील नवीन शाखांचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील नवीन शाखा गोंदिया शाखा (गुरुनानक वॉर्ड, जुना बस स्थानक रोड, गोंदिया) आणि गोरेगाव पूर्व शाखा (विश्वेश्वरनगर, गोरेगाव पूर्व, मुंबई) येथे स्थित आहेत.


देशभरात आपली उपस्थिती मजबूत करणे आणि नावीन्यपूर्ण बँकिंग सुविधा ग्राहकांच्या अधिक जवळ आणणे हे बंधन बँकेच्या शाखा विस्ताराचे उद्दिष्ट आहे. या नव्या शाखांच्या उद्घाटनानंतर बँक आता ६,३०० हून अधिक बँकिंग आउटलेट्सच्या मजबूत नेटवर्कद्वारे आपल्या ग्राहकांना सेवा देणार आहे. बंधन बँकेची आता महाराष्ट्रात ३०० बँकिंग आउटलेट आहेत.



या प्रसंगी बोलताना बंधन बँकेचे एमडी आणि सीईओ, श्री. पार्थ प्रतिम सेनगुप्ता म्हणाले, "तीन राज्यांमध्ये नऊ नवीन शाखा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे, विशेषतः महाराष्ट्रातील दोन शाखांचा समावेश हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या शाखा विस्तारामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक प्रभावी सेवा प्रदान करू शकू. विस्तारित वितरण नेटवर्कद्वारे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आम्ही सातत्याने वाढीवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांसाठी योग्य बँकिंग सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत."


बंधन बँक सध्या देशातील ३६ पैकी ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला