AUS vs SA : पावसाचा गोंधळ, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने सेमीफायनलमध्ये रोमांचक स्पर्धा

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील सातवा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता. मात्र खराब हवामान आणि सातत्याने पावसामुळे सामना रद्द घोषित करण्यात आला. हवामान इतके खराब होते की दोन्ही संघाचे कर्णधार टॉरससाठीही बाहेर पडू शकले नाहीत. हा सामना महामुकाबल्यासारखा होईल अशी अपेक्षा होती मात्र दोन्ही संघांना खराब हवामानाचा फटका सहन करावा लागला. सामना रद्द झाल्याने ग्रुप बीमधील दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे.



महत्त्वाचा होता ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना


हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सेमीफायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. यात जिंकणाऱ्या संघाचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित होणार होणते मात्र हा सामना रद्द झाल्याने इंग्लंड आणि अफगाणिस्तानसाठी ही चांगली बाब आहे. कारण त्या दोघांना अद्यापही सेमीफायनलचे दरवाजे खुले आहेत.


द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सध्या ग्रुप बीमध्ये तीन तीन गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानसोबत सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत कांगारूंचा संघ सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाल्यास ते स्पर्धेतून बाहेर जातील.


जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला. तसेच इंग्लंडच्या संघाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला काही करून हरवावे अशी प्रार्थना करावी लागेल.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण