Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाजारात रताळ्याची आवक सुरू

पुणे : महाशिवरात्र बुधवारी असल्याने बाजारात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात राज्यातील गावरान रताळे प्रति किलो ३५-४० रुपये, तर कर्नाटक भागातील रताळ्यांना दर्जानुसार २० ते २२ रुपये भाव मिळत आहे. तसेच, किरकोळ बाजारात ५०-६० रुपये भाव मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आवक झाली आहे. तरीही भाव जास्त मिळत असल्याची माहिती अडतदार यांनी दिली. मार्केट यार्डात अडीच हजार पोती रताळ्याची आवक झाली. बेळगाव भागातूनही नगण्य आवक झाली. या रताळ्यांना किलोला २० ते २२ रुपये भाव मिळत आहे.



कराड, मलकापूर भागातून गावरान रताळे येत असतात. हे रताळे चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळ्यांना जास्त मागणी असते. परिणामी यांना इतर रताळांच्या तुलनेत जास्त भाव मिळतो. कर्नाटकमधून आलेले रताळे आकाराने मोठी, तुरट असतात. त्यामुळे त्यांना गावरानच्या तुलनेत कमी भाव असतो. मात्र, मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत वाहतूक खर्च परवडत नसल्याने आवक नगण्य होत आहे. पंढरपूर भागातील रताळे दिसायला थोडे पांढरे आणि कमी गोड असतात.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई