Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाजारात रताळ्याची आवक सुरू

  83

पुणे : महाशिवरात्र बुधवारी असल्याने बाजारात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात राज्यातील गावरान रताळे प्रति किलो ३५-४० रुपये, तर कर्नाटक भागातील रताळ्यांना दर्जानुसार २० ते २२ रुपये भाव मिळत आहे. तसेच, किरकोळ बाजारात ५०-६० रुपये भाव मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आवक झाली आहे. तरीही भाव जास्त मिळत असल्याची माहिती अडतदार यांनी दिली. मार्केट यार्डात अडीच हजार पोती रताळ्याची आवक झाली. बेळगाव भागातूनही नगण्य आवक झाली. या रताळ्यांना किलोला २० ते २२ रुपये भाव मिळत आहे.



कराड, मलकापूर भागातून गावरान रताळे येत असतात. हे रताळे चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळ्यांना जास्त मागणी असते. परिणामी यांना इतर रताळांच्या तुलनेत जास्त भाव मिळतो. कर्नाटकमधून आलेले रताळे आकाराने मोठी, तुरट असतात. त्यामुळे त्यांना गावरानच्या तुलनेत कमी भाव असतो. मात्र, मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत वाहतूक खर्च परवडत नसल्याने आवक नगण्य होत आहे. पंढरपूर भागातील रताळे दिसायला थोडे पांढरे आणि कमी गोड असतात.

Comments
Add Comment

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी