Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाजारात रताळ्याची आवक सुरू

  58

पुणे : महाशिवरात्र बुधवारी असल्याने बाजारात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात राज्यातील गावरान रताळे प्रति किलो ३५-४० रुपये, तर कर्नाटक भागातील रताळ्यांना दर्जानुसार २० ते २२ रुपये भाव मिळत आहे. तसेच, किरकोळ बाजारात ५०-६० रुपये भाव मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आवक झाली आहे. तरीही भाव जास्त मिळत असल्याची माहिती अडतदार यांनी दिली. मार्केट यार्डात अडीच हजार पोती रताळ्याची आवक झाली. बेळगाव भागातूनही नगण्य आवक झाली. या रताळ्यांना किलोला २० ते २२ रुपये भाव मिळत आहे.



कराड, मलकापूर भागातून गावरान रताळे येत असतात. हे रताळे चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळ्यांना जास्त मागणी असते. परिणामी यांना इतर रताळांच्या तुलनेत जास्त भाव मिळतो. कर्नाटकमधून आलेले रताळे आकाराने मोठी, तुरट असतात. त्यामुळे त्यांना गावरानच्या तुलनेत कमी भाव असतो. मात्र, मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत वाहतूक खर्च परवडत नसल्याने आवक नगण्य होत आहे. पंढरपूर भागातील रताळे दिसायला थोडे पांढरे आणि कमी गोड असतात.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत