शशी थरुर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज

नवी दिल्ली : केरळ काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर हे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. ते गांधी परिवारावरही नाराज असल्याचे वृत्त आहे. एका पॉडकास्टमध्ये थरुर यांनी त्यांच्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली. याआधी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे थरुर यांनी जाहीररित्या कौतुक केले.



काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि प्रवक्ते मोदींवर टीका करत असताना थरुर यांनी वेगळी भूमिका घेतली. पॉडकास्टमध्ये तर शशी थरुर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वालाच खडे बोल सुनावले. 'केरळमध्ये काँग्रेसच्या मतांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे प्रमाण वाढवता येईल. पण याकरिता काँग्रेसला स्वतःच्या कामाची पद्धत बदलावी लागेल. जनतेशी थेट संवाद साधावा लागेल. जनतेच्या आशाआकांक्षा, स्वप्न समजून घेऊन त्यासाठी काम करावं लागेल. जनतेमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करावा लागेल. केरळमध्ये डाव्या पक्षांनी नागरिकांमध्ये स्वतःची उत्तम प्रतिमा निर्माण केली. लोकांना विश्वास वाटला म्हणून ते आजही निवडणुका जिंकत आहेत. तर भाजपाने देश पातळीवर स्वतःविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेस असे करताना दिसत नाही. काँग्रेसचे मताधिक्य अर्थात व्होट शेअर वाढताना दिसत नाही. कालबाह्य होत असलेल्या विचार आणि संकल्पना पक्षाला मताधिक्य वाढवून देणार नाही'; असे शशी थरुर म्हणाले.



केरळमध्ये काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे. अनेकांना काँग्रेस पक्ष आवडत नाही. पण या प्रतिकूल परिस्थितीतही मी निवडणूक जिंकतोय कारण लोकांना माझं म्हणणं पटतंय. त्यांना माझ्याविषयी विश्वास आहे. हा विश्वास ढळू देणार नाही, असे शशी थरुर म्हणाले.
Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू