S. Jaishankar : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली कानउघडणी

“बांगलादेशने ठरवावे, त्यांना कसे संबंध हवे”


नवी दिल्ली : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशने भारतासोबत नेमके कसे संबंध हवे आहेत याचा निर्णय बांगलादेशने करावा, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (S. Jaishankar) यांनी केले आहे.


बांगलादेशकडून वारंवार दोन्ही देशांमधील सौहार्दाच्या वातावरणाला तडे देणारे प्रकार घडल्यानंतर जयशंकर यांनी थेट कानउघडणी करणारे हे वक्तव्य केले आहे.


बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आणि मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. तेथील हिंदूंच्या नरसंहारावर भारताने जोरदार आवाज उठवला आहे. त्याचवेळी बांगलादेशचे अंतरिम सरकार मात्र भारतासोबतचे संबंध बिघडवण्यात कोणतीही संधी सोडत नाही.



नुकतेच ओमानमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांची भेट घेतली होती. पण बांगलादेश सुधारत नसल्यामुळे या बैठकीनंतर सुमारे आठवडाभरानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बांगलादेशच्या प्रतिकूल वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.


यासंदर्भात जयशंकर म्हणाले की, बांगलादेशला ठरवावे लागेल की ते आपल्याशी ते कशा प्रकारचे संबंध ठेवू इच्छितात? बांगलादेशासोबतचा आमचा दीर्घ आणि विशेष इतिहास १९७१चा आहे.



बांगलादेश भारतासोबत चांगले संबंध हवे आहे असे म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे तेथे होणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. याबाबतचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा आहे, असे सुतोवाच जयशंकर यांनी केले.


द्विपक्षीय संबंधांमधील समस्यांमागे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे अल्पसंख्याकांवरील जातीय हिंसाचार. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार सुरू आहे. त्याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच झाला आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर आपण बोलले पाहिजे. आणि दुसरे म्हणजे बांगलादेशचे राजकारण आहे. आता त्यांनीच ठरवावं की त्यांना आमच्याशी कसे संबंध ठेवायचे आहे?

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन