S. Jaishankar : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली कानउघडणी

“बांगलादेशने ठरवावे, त्यांना कसे संबंध हवे”


नवी दिल्ली : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशने भारतासोबत नेमके कसे संबंध हवे आहेत याचा निर्णय बांगलादेशने करावा, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (S. Jaishankar) यांनी केले आहे.


बांगलादेशकडून वारंवार दोन्ही देशांमधील सौहार्दाच्या वातावरणाला तडे देणारे प्रकार घडल्यानंतर जयशंकर यांनी थेट कानउघडणी करणारे हे वक्तव्य केले आहे.


बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आणि मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. तेथील हिंदूंच्या नरसंहारावर भारताने जोरदार आवाज उठवला आहे. त्याचवेळी बांगलादेशचे अंतरिम सरकार मात्र भारतासोबतचे संबंध बिघडवण्यात कोणतीही संधी सोडत नाही.



नुकतेच ओमानमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांची भेट घेतली होती. पण बांगलादेश सुधारत नसल्यामुळे या बैठकीनंतर सुमारे आठवडाभरानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बांगलादेशच्या प्रतिकूल वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.


यासंदर्भात जयशंकर म्हणाले की, बांगलादेशला ठरवावे लागेल की ते आपल्याशी ते कशा प्रकारचे संबंध ठेवू इच्छितात? बांगलादेशासोबतचा आमचा दीर्घ आणि विशेष इतिहास १९७१चा आहे.



बांगलादेश भारतासोबत चांगले संबंध हवे आहे असे म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे तेथे होणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. याबाबतचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा आहे, असे सुतोवाच जयशंकर यांनी केले.


द्विपक्षीय संबंधांमधील समस्यांमागे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे अल्पसंख्याकांवरील जातीय हिंसाचार. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार सुरू आहे. त्याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच झाला आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर आपण बोलले पाहिजे. आणि दुसरे म्हणजे बांगलादेशचे राजकारण आहे. आता त्यांनीच ठरवावं की त्यांना आमच्याशी कसे संबंध ठेवायचे आहे?

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर