S. Jaishankar : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली कानउघडणी

“बांगलादेशने ठरवावे, त्यांना कसे संबंध हवे”


नवी दिल्ली : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशने भारतासोबत नेमके कसे संबंध हवे आहेत याचा निर्णय बांगलादेशने करावा, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (S. Jaishankar) यांनी केले आहे.


बांगलादेशकडून वारंवार दोन्ही देशांमधील सौहार्दाच्या वातावरणाला तडे देणारे प्रकार घडल्यानंतर जयशंकर यांनी थेट कानउघडणी करणारे हे वक्तव्य केले आहे.


बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आणि मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. तेथील हिंदूंच्या नरसंहारावर भारताने जोरदार आवाज उठवला आहे. त्याचवेळी बांगलादेशचे अंतरिम सरकार मात्र भारतासोबतचे संबंध बिघडवण्यात कोणतीही संधी सोडत नाही.



नुकतेच ओमानमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांची भेट घेतली होती. पण बांगलादेश सुधारत नसल्यामुळे या बैठकीनंतर सुमारे आठवडाभरानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बांगलादेशच्या प्रतिकूल वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.


यासंदर्भात जयशंकर म्हणाले की, बांगलादेशला ठरवावे लागेल की ते आपल्याशी ते कशा प्रकारचे संबंध ठेवू इच्छितात? बांगलादेशासोबतचा आमचा दीर्घ आणि विशेष इतिहास १९७१चा आहे.



बांगलादेश भारतासोबत चांगले संबंध हवे आहे असे म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे तेथे होणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. याबाबतचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा आहे, असे सुतोवाच जयशंकर यांनी केले.


द्विपक्षीय संबंधांमधील समस्यांमागे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे अल्पसंख्याकांवरील जातीय हिंसाचार. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार सुरू आहे. त्याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच झाला आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर आपण बोलले पाहिजे. आणि दुसरे म्हणजे बांगलादेशचे राजकारण आहे. आता त्यांनीच ठरवावं की त्यांना आमच्याशी कसे संबंध ठेवायचे आहे?

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ