S. Jaishankar : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली कानउघडणी

“बांगलादेशने ठरवावे, त्यांना कसे संबंध हवे”


नवी दिल्ली : देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देणा-या बांगलादेशने भारतासोबत नेमके कसे संबंध हवे आहेत याचा निर्णय बांगलादेशने करावा, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (S. Jaishankar) यांनी केले आहे.


बांगलादेशकडून वारंवार दोन्ही देशांमधील सौहार्दाच्या वातावरणाला तडे देणारे प्रकार घडल्यानंतर जयशंकर यांनी थेट कानउघडणी करणारे हे वक्तव्य केले आहे.


बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आणि मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. तेथील हिंदूंच्या नरसंहारावर भारताने जोरदार आवाज उठवला आहे. त्याचवेळी बांगलादेशचे अंतरिम सरकार मात्र भारतासोबतचे संबंध बिघडवण्यात कोणतीही संधी सोडत नाही.



नुकतेच ओमानमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांची भेट घेतली होती. पण बांगलादेश सुधारत नसल्यामुळे या बैठकीनंतर सुमारे आठवडाभरानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बांगलादेशच्या प्रतिकूल वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.


यासंदर्भात जयशंकर म्हणाले की, बांगलादेशला ठरवावे लागेल की ते आपल्याशी ते कशा प्रकारचे संबंध ठेवू इच्छितात? बांगलादेशासोबतचा आमचा दीर्घ आणि विशेष इतिहास १९७१चा आहे.



बांगलादेश भारतासोबत चांगले संबंध हवे आहे असे म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे तेथे होणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. याबाबतचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा आहे, असे सुतोवाच जयशंकर यांनी केले.


द्विपक्षीय संबंधांमधील समस्यांमागे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे अल्पसंख्याकांवरील जातीय हिंसाचार. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार सुरू आहे. त्याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच झाला आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर आपण बोलले पाहिजे. आणि दुसरे म्हणजे बांगलादेशचे राजकारण आहे. आता त्यांनीच ठरवावं की त्यांना आमच्याशी कसे संबंध ठेवायचे आहे?

Comments
Add Comment

दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज, महिला घाबरली आणि पोलिसांना दिली माहिती

दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : हल्ल्याचे संपूर्ण ब्लूप्रिंट आले समोर !

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक

Delhi bomb Blast : काश्मीर-फरीदाबाद कनेक्शन उघड! ८ ते १२ नोव्हेंबरच्या तारखा आणि २५ संशयितांची नावे; ५ सनसनाटी खुलाशांनी तपास यंत्रणा हादरल्या

फरीदाबाद : लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले डॉक्टर उमर मोहम्मद उर्फ उमर उन नबी आणि

दिल्ली स्फोटानंतर पाचशे मीटरवर सापडला तुटलेला हात, परिसरात भीतीचं वातावरण

दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारबॉम्बच्या स्फोटाने संपूर्ण दिल्ली हादरली. सोमवारी रात्री साडेसातच्या

‘मेजवानीसाठी बिर्याणी तयार आहे’, दहशतवाद्यांचा कोडवर्ड साधा पण अर्थ धक्कादायक!

नवी दिल्ली: दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या मोठ्या स्फोटाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या दहशतवादी

Toll Plaza Rules : खिशाला बसणार 'दुगना लगान'चा फटका! १५ नोव्हेंबरपासून टोल प्लाझावर नवा नियम; 'ही' चूक केल्यास दुप्पट शुल्क भरावे लागणार

नवी दिल्ली : जर तुम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत