विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा

दुबई : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान विराट कोहलीने पटकावला आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५७ झेल घेतले. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात नसीम शाहला झेलबाद केले. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन परतला. हाच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतलेला १५७ वा झेल ठरला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय क्रिकेटपटू

विराट कोहली (खेळत आहे) १५७ झेल
मोहम्मद अझरुद्दीन (निवृत्त) १५६ झेल
सचिन तेंडुलकर (निवृत्त) १४० झेल
राहुल द्रविड (निवृत्त) १२४ झेल
सुरेश रैना (निवृत्त) १०२ झेल

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम करणारा क्रिकेटपटू

महेला जयवर्धने, श्रीलंका (निवृत्त) २१८ झेल
रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया (निवृत्त) १६० झेल
विराट कोहली, भारत (खेळत आहे) १५७ झेल

हार्दिक पांड्याने घेतले २०२ आंतरराष्ट्रीय बळी

भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११ सामन्यांतील १९ डावांत गोलंदाजी करुन १७ बळी घेतले. तसेच त्याने ११४ टी २० सामन्यांतील १०२ डावांत गोलंदाजी करुन ९४ बळी घेतले. हार्दिकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ सामन्यांतील ८५ डावांत गोलंदाजी करुन ८९ बळी घेतले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने ८ षटकांत ३१ धावा देत दोन बळी घेतले. त्याने बाबर आझमला २३ धावा केल्यानंतर यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले तर सौद शकीलला ६२ धावा केल्यानंतर अक्षर पटेलकरवी झेलबाद केले.
Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील