विराट कोहलीने केला सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम, हार्दिकने ओलांडला २०० बळींचा टप्पा

दुबई : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान विराट कोहलीने पटकावला आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५७ झेल घेतले. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात नसीम शाहला झेलबाद केले. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन परतला. हाच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतलेला १५७ वा झेल ठरला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय क्रिकेटपटू

विराट कोहली (खेळत आहे) १५७ झेल
मोहम्मद अझरुद्दीन (निवृत्त) १५६ झेल
सचिन तेंडुलकर (निवृत्त) १४० झेल
राहुल द्रविड (निवृत्त) १२४ झेल
सुरेश रैना (निवृत्त) १०२ झेल

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम करणारा क्रिकेटपटू

महेला जयवर्धने, श्रीलंका (निवृत्त) २१८ झेल
रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया (निवृत्त) १६० झेल
विराट कोहली, भारत (खेळत आहे) १५७ झेल

हार्दिक पांड्याने घेतले २०२ आंतरराष्ट्रीय बळी

भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११ सामन्यांतील १९ डावांत गोलंदाजी करुन १७ बळी घेतले. तसेच त्याने ११४ टी २० सामन्यांतील १०२ डावांत गोलंदाजी करुन ९४ बळी घेतले. हार्दिकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ सामन्यांतील ८५ डावांत गोलंदाजी करुन ८९ बळी घेतले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने ८ षटकांत ३१ धावा देत दोन बळी घेतले. त्याने बाबर आझमला २३ धावा केल्यानंतर यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले तर सौद शकीलला ६२ धावा केल्यानंतर अक्षर पटेलकरवी झेलबाद केले.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Final Match : जाणून घ्या जिंकणाऱ्या संघाला किती कोटी मिळणार?

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद

Lea Tahuhu : न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहू एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत