Mahashivaratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद!

  111

भाविकांच्या दर्शनासाठी ४१ तास मंदिर राहणार खुलं


नाशिक : महाशिवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्त अनेक शिवभक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरात जातात. यातच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. दरवर्षी होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे.



 महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने, त्र्यंबकेश्वर मंदिर २ दिवस चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे. या काळात व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील बंद ठेवण्यात येणार आहे. तर २६ तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन (पेड दर्शन) देखील बंद राहणार आहे.



महाशिवरात्रीनिमित्त ट्रस्टची जय्यत तयारी 


महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे त्तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी (२४ फेब्रुवारी) मेहंदी तसेच मंगळवारी (२५ फेब्रुवारी) हळदीचा समारंभ होणार आहे. सायंकाळी बासरी वादन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघेल. पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत. ट्रस्टतर्फे बुधवारी (२६ फेब्रुवारी) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक