Solapur News : व्यायामासाठीच्या दोरीचा गळफास बसून विद्यार्थ्याचा मृत्यू

सोलापूर : आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अंकोली, ता. मोहोळ येथे घडली. हर्षवर्धन विनायक इंगळे (वय- १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता दहावीत शिकत होता. परीक्षेच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची अकस्मात मयत अशी मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे.




मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत हर्षवर्धनच्या आईला अर्धांगवायूचा आजार झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना व्यायामाचा सल्ला दिला होता. व्यायामाने आईला लवकर बरे वाटावे म्हणून घराच्या पत्र्याच्या अँगलला एक दोरी बांधून तिला लोखंडी सळईचा त्रिकोणी अँगल बनविला होता व त्याला मूठ लावलेली होती. त्याद्वारे आईचा व्यायाम सुरू होता.

दरम्यान, आईकडे जाताना घरात अंधार होता त्यामुळे हर्षवर्धनला ती लोंबकळत असलेली दोरी दिसली नाही. त्यामुळे तो तसाच पुढे गेला असता सदर दोरीचा हर्षवर्धनच्या गळ्याला फास लागला व तो गतप्राण झाला.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे