INDvs PAK : पाकिस्तानचे सलामीवीर झटपट तंबूत

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या साखळी सामन्यात पाकिस्तानला सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानचे सलामीवीर झटपट तंबूत परतले आहेत. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम २३ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन परतला. तर इमाम उल हक १० धावा करुन धावचीत झाला. अक्षर पटेलने चेंडू थेट यष्ट्यांवर फेकून इमामला बाद केले. पाकिस्तानचा पहिला फलंदाज ४१ धावा झाल्या असताना आणि दुसरा फलंदाज ४७ धावा झाल्या असताना बाद झाला. पाकिस्तानने ११ षटकांत दोन बाद ५५ धावा केल्या. सौद शकील आणि मोहम्मद रिझवान (कर्णधार) हे दोघे फलंदाजी करत आहेत.



भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत - पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाला नमवित श्रीलंकेचा सुपर ८मध्ये प्रवेश, पथुम निसांकाच्या वादळी शतकी खेळीने कांगारुंचा पराभव

नवी दिल्ली  : टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ३०व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या

इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी विजय

नवी दिल्ली  : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्येप्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून

अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातला दाखविले आसमान

ओमरझाईचे चार बळी, इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकी खेळीने मिळाला विजय नवी दिल्ली : मुख्य गोलंदाज अझमतुल्ला

टी-२० मध्ये रशीद खानचा ७०० बळींचा वर्ल्ड रेकॉर्ड!

ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी पहिला सामना अफगाणिस्तान

वर्ल्डकपमध्ये जागा टिकविण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथला निमंत्रण

मुंबई  : दुखापतींचे ग्रहण, खराब फॉर्म आणि झिम्बाब्वेविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव यामुळे ऑस्ट्रेलियावर

भारत सुपर एटमध्ये कोणाविरुद्ध खेळणार ?

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना ६१ धावांनी जिंकलेला भारत अ गटातून