Kasara Ghat : मुंबई-नाशिक मार्गावरील जुना कसारा घाट आठ दिवस बंद

शहापूर  : मुंबई - नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या जुन्या कसारा घाटातील रस्त्याची दुरुस्ती दोन टप्प्यांत होणार असल्याने आठ दिवस हलक्या व अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.



मुंबई - नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात किमी ४६६/८०० ते ४७४/३०० दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता २४ ते २७ फेब्रुवारी व ३ ते ६ मार्च दरम्यान सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हलक्या व जड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व चालकांना इप्सित स्थळी जाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून चालकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी केले आहे. नाशिक दिशेला जाणारी वाहने ४७४/३०० चिंतामणवाडी पोलीस चौकी समोरून वाहतूक उजव्या बाजूने नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे.


तसेच नाशिक ते मुंबई वाहतूक करणारी वाहने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुंबई-नाशिक वाहतूक करणारे वाहनांनी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग क्र. ६० वरून इच्छित स्थळी जातील.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला