शहापूर : मुंबई – नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या जुन्या कसारा घाटातील रस्त्याची दुरुस्ती दोन टप्प्यांत होणार असल्याने आठ दिवस हलक्या व अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
मुंबई – नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात किमी ४६६/८०० ते ४७४/३०० दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता २४ ते २७ फेब्रुवारी व ३ ते ६ मार्च दरम्यान सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हलक्या व जड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व चालकांना इप्सित स्थळी जाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून चालकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी केले आहे. नाशिक दिशेला जाणारी वाहने ४७४/३०० चिंतामणवाडी पोलीस चौकी समोरून वाहतूक उजव्या बाजूने नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे.
तसेच नाशिक ते मुंबई वाहतूक करणारी वाहने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुंबई-नाशिक वाहतूक करणारे वाहनांनी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग क्र. ६० वरून इच्छित स्थळी जातील.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…