पाकिस्तानची दाणादाण, भारतापुढे २४२ धावांचे आव्हान

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पण त्यांना ५० षटके खेळणे जमले नाही. पाकिस्तानचा डाव ४९.४ षटकांत आटोपला. कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव २४१ धावांत आटोपला. आता भारतापुढे ५० षटकांत २४२ धावा करण्याचे आव्हान आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास साखळीतील सलग दोन सामने जिंकत भारत उपांत्य फेरीत प्रवेश करू शकले.



प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचे सलामीचे दोन फलंदाज ५० धावा होण्याआधीच परतले. पाकिस्तानचा अर्धा संघ १६५ धावांवर बाद झाला होता. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दबाव आणखी वाढवला आणि पाकिस्तान २५० धावांचा टप्पा गाठू शकणार नाही याची खबरदारी घेतली.

सलामीला आलेला बाबर आझम २३ धावा केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ इमाम उल हक १० धावा करुन धावचीत झाला. अक्षर पटेलने त्याला धावचीत केले. कर्णधार असलेला मोहम्मद रिझवान ४६ धावा केल्यानंतर अक्षर पटेलच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सौद शकील ६२ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. तय्यब ताहिर चार धावा करुन रविंद्र जडेजाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सलमान आघा १९ धावा करुन कुलदीप यादवच्या चेंडूवर रविंद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. शाहीन आफ्रिदी शून्य धावांवर कुलदीप यादवच्या चेंडूवर पायचीत झाला. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देत तंबूत परतला. हारिस रौफ आठ धावा केल्यावर धावचीत झाला. त्याला अक्षर पटेलने यष्टीरक्षक केएल राहुलच्या मदतीने बाद केले. खुशदिल शाह ३८ धावा करुन हर्षित राणाच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देऊन बाद झाला. अबरार अहमद शून्य धावा करुन नाबाद राहिला.

भारताकडून कुलदीप यादवने तीन, हार्दिक पांड्याने दोन तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत – पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

SRHvsPBKS : क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा भोवला, पंजाब किंग्सचा पराभव; सनरायझर्स हैदराबादचा विजय

कूपर कॉनलीची एकाकी शतकी झुंज पंजाबने हैदराबादला अव्वल स्थान केले बहाल हैदराबाद : २२०+ धावा उभारल्यानंतर विजय

PAK VS IND : कधी होणार भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना ? आली मोठी अपडेट

BCCI UPDATE : भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात. स्टेडियम हाऊसफुल

Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटला आयटीएकडून नोटीस ; उत्तेजक चाचणीत अनउपस्थिती....

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला उत्तेजक चाचणी देण्यासाठी गैरहजर राहिल्याप्रकरणी इंटरनॅशन टेस्टिंग

IPL 2026 : प्लेऑफचे ठिकाण झाले पक्के ; बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

बंगळुरुमध्ये एकही सामना नाही...तिकीटेमुळे वाद BCCI UPDATE : आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगामातील अखेरचा साखळी

SRH VS PBKS : टॉप स्पॉटसाठी हैदराबाद विरुद्ध पंजाब; हैद्राबादमध्ये रंगणार थरारक सामना !

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज राजीव गांधी स्टेडियमवर टेबल टॉपर्संची लढत होणार आहे. हंगामातील ४९ वा सामना पंजाब विरुद्ध

ICC T20 Rankings : आयसीसी टी२० क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम

मुंबई : आयसीसीने पुरुषांची नवीन टी२० सांघिक क्रमवारी जाहीर केली. या यादीत भारत अव्वल स्थानी कायम आहे. सूर्यकुमार