Water Shortage : शहापूरमध्ये पाणीबाणी! १० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई; 'टँकरवारी' सुरू

ठाणे : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात सुमारे मार्च महिन्याच्या मध्यानंतर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या (water shortage) अधिक तीव्र झाल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. सुमारे १० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई (Water Crisis) जाणवत असून या गावांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.



ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात होते. तर शहापूर तालुक्यातील नागरिकांना याची भीषणता अधिक तीव्रतेने जाणवते. यासाठी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाही फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच शहापूर मधील सुमारे १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांना टँकरने, विंधन विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी आरखडा आखण्यात आला आहे. यातील सुमारे २२३ गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.


मागील दोन वर्षाच्या कालावधीत शहापूर तसेच मुरबाड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन राबविण्यात आले. तसेच प्रत्येक घरात नळजोडणीही देण्यात आली. मात्र, अद्याप नळांद्वारे पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे या जोडण्याचे काय करायचे, असा संतप्त सवाल शहापूरवासीय करीत आहेत.

Comments
Add Comment

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा