वसई-विरार महापालिका राज्यात ९ व्या क्रमांकावर

विरार : सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरविण्यासोबतच मनपाचा कारभार सुलभ व पारदर्शक करण्यासाठी असलेल्या 'ई गव्हर्नन्स' या उपक्रमात राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने ९ वा क्रमांक पटकावला आहे. कोरोनानंतर सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ऑनलाइन सेवा वितरणाचे महत्त्व वाढले आहे. शासनाने इ गव्हर्नन्स हा आधुनिक शासकीय चौकटीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून ई गव्हर्नन्सचे कार्य सुरू केलेले आहे. राज्यातील महानगरपालिकांद्वारे वर्षभरात 'ई गव्हर्नन्स'च्या माध्यमातून केल्या गेलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात येते. यावर्षी सुद्धा पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच 'पीआरओ' या पुण्याच्या संस्थेने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत २९ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक तपासला.



यामध्ये पुणे महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावला असून कोल्हापूर द्वितीय, पिंपरी-चिंचवड या महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ई-गव्हर्नन्समधील सेवा, पारदर्शकता, वेबसाईट उपलब्धता, मोबाईल ॲप, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या बाबींच्या केलेल्या मूल्यमापनात वसई-विरार शहर महानगरपालिकेने यावर्षी नववा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया या शीर्षकाखाली करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये राज्यातील १७ महानगरपालिकांनी चांगले काम केले असून यामध्ये वसई-विरार शहर महापालिकेचा सुद्धा समावेश आहे. वसई विरार महानगरपालिकेने वेबसाईट उपलब्धतेमध्ये १२ गुण मिळवले असून वेबसाईट सेवामध्ये १८ गुण, वेबसाईट पारदर्शकतेमध्ये २३ गुण, मोबाईल ॲपमध्ये १६ गुण तर सोशल मीडियामध्ये तीन पैकी तीन गुण मिळविले आहेत.

Comments
Add Comment

१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा

सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा

आठ तासांच्या शिफ्टबाबत दीपिका पादुकोणच्या समर्थनात आशुतोष राणा; म्हणाले, “आठ तास पुरेसे आहेत”

वर्क शेड्यूलवर मोठी चर्चा: दीपिका पादुकोणच्या बाजूने आशुतोष राणा यांनी मांडले आपले मत गेल्या वर्षी दीपिका

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका टाळून

अल्पवयीन वर्षीय अभिनेत्रीचा तसला सीन प्रसारित; प्रेक्षकांकडून थेट कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी

मुंबई : हिंदी टीव्हीवरील एका लोकप्रिय मालिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मालिकेत अल्पवयीन अभिनेत्रीला

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका

बारामती विमान अपघातातील पीडितांना साश्रू नयनांनी निरोप; फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या अंत्यदर्शनावेळी भावनिक क्षण

मुंबई : काल २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा ठरला आहे.काल बारामती येथे अजीत पवारांचा विमान अपघातात