वसई-विरार महापालिका राज्यात ९ व्या क्रमांकावर

विरार : सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरविण्यासोबतच मनपाचा कारभार सुलभ व पारदर्शक करण्यासाठी असलेल्या 'ई गव्हर्नन्स' या उपक्रमात राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने ९ वा क्रमांक पटकावला आहे. कोरोनानंतर सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ऑनलाइन सेवा वितरणाचे महत्त्व वाढले आहे. शासनाने इ गव्हर्नन्स हा आधुनिक शासकीय चौकटीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून ई गव्हर्नन्सचे कार्य सुरू केलेले आहे. राज्यातील महानगरपालिकांद्वारे वर्षभरात 'ई गव्हर्नन्स'च्या माध्यमातून केल्या गेलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात येते. यावर्षी सुद्धा पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच 'पीआरओ' या पुण्याच्या संस्थेने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत २९ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक तपासला.



यामध्ये पुणे महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावला असून कोल्हापूर द्वितीय, पिंपरी-चिंचवड या महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ई-गव्हर्नन्समधील सेवा, पारदर्शकता, वेबसाईट उपलब्धता, मोबाईल ॲप, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या बाबींच्या केलेल्या मूल्यमापनात वसई-विरार शहर महानगरपालिकेने यावर्षी नववा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया या शीर्षकाखाली करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये राज्यातील १७ महानगरपालिकांनी चांगले काम केले असून यामध्ये वसई-विरार शहर महापालिकेचा सुद्धा समावेश आहे. वसई विरार महानगरपालिकेने वेबसाईट उपलब्धतेमध्ये १२ गुण मिळवले असून वेबसाईट सेवामध्ये १८ गुण, वेबसाईट पारदर्शकतेमध्ये २३ गुण, मोबाईल ॲपमध्ये १६ गुण तर सोशल मीडियामध्ये तीन पैकी तीन गुण मिळविले आहेत.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या