एकनाथ शिंदेंना धमकी देण्याच्या प्रकरणाला नवे वळण, हाती आली धक्कादायक माहिती

  61

बुलढाणा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदेंच शासकीय वाहन बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई आणि अकोला एटीएस तसेच मुंबई गुन्हे शाखा कक्ष १२ च्या पोलिस पथकाने कारवाई केली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथून ई-मेल पाठविणाऱ्या अभय शिंगणे (२५) आणि त्याचा नातलग मंगेश वायाळ या दोघांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी एटीएसच्या पथकाने दोघांना अटक करून मुंबईला नेले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अभय शिंगणेच्या दुकानात मंगेश वायाळ याने मोबाइल चार्जिंगला लावला होता. याच मोबाईलमध्ये असलेल्या मंगेशच्या ई - मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवण्यात आला. विशेष म्हणजे मंगेशच्या ई - मेल आयडीवरुन पाठवण्यात आलेला हा पहिला ई - मेल आहे. आपण मेल पाठवलेला नाही, असे मंगशचे म्हणणे आहे.



अभयचे एका तरुणीवर प्रेम होते. या तरुणीचा मृत्यू झाला. या मृत्यूला अभय जबाबदार असल्याचा आरोप मंगेश करत होता. याच मुद्यावरुन मंगेशने अभयला शिवीगाळ आणि मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी अभयने मंगेशच्या ई - मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. आतेभाऊ-मामेभाऊ असे आरोपींचे नाते आहे. मंगेश वायाळ अल्पशिक्षित असून, अभयचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे; अशीही माहिती हाती आली आहे. पण या प्रकरणात सखोल चौकशी करुन मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केली आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या