मोडक्या खुर्चीवर बसून कृषीमंत्र्यांनी केला विमान प्रवास

नवी दिल्ली : विमान प्रवासात वेळेची बचत होते, प्रवास आरामदायी आणि सुखकारक होतो यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्या वाढू लागली आहे. नुकताच केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एअर इंडियामधून विमान प्रवास केला. त्यांनी हा प्रवास एअर इंडियाच्या एआय ४३६ विमानातून भोपाळ ते दिल्ली असा प्रवास केला. या प्रवासाकरिता त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट काढले होते. पण त्यांना विमानात मोडक्या खुर्चीवर बसावे लागले. संपूर्ण प्रवास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोडक्या खुर्चीत बसून केला. या घटनेबाबत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक एक्स पोस्ट केली. त्यांनी पोस्टद्वारे मोडक्या खुर्चीबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाकडे नाराजी व्यक्त केली.



शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार,ते विमानात तिकिटावर नमूद खुर्चीवर बसण्यासाठी गेले. त्यावेळी खुर्ची मोडकी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खुर्ची सदोष असल्याची माहिती वरिष्ठांना कळवली होती. पण वरिष्ठांनी त्या माहितीकडे दुर्लक्ष केले. यामुळे तिकीट विक्रीच्या वेळी मोडक्या खुर्चीची जागा पण विक्रीसाठी उपलब्ध होती. नेमके त्याच आसनाचे तिकीट खरेदी केल्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर मोडक्या खुर्चीतून प्रवास करण्याची वेळ आली. विमानाच्या तिकिटाचे पैसे मोजूनही मोडकी खुर्ची मिळाल्याबाबत कृषीमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कंपनीचे व्यवस्थापन टाटा समुहाकडे आहे. यामुळे कारभार सुधारला असेल, अशी आशा होती. पण तसे झाले नसल्याचे ताज्या घटनेवरुन दिसते, अशी पोस्ट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची पोस्ट बघताच एअर इंडियाच्या सोशल मिडिया टीमने त्यांना तातडीने रिप्लाय केला. झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली तसेच विमानांतील सदोष आसने बदलण्याचे काम तातडीने हाती घेतल्याचे जाहीर केले.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला