IPL 2025 : मुंबई इंडियन्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा!

मुंबई : आयपीएल २०२५ (IPL 2025) मार्च महिन्यापासून सुरू होणार असून या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध झाले. दरम्यान आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) नवीन जर्सी लॉंच झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मागील हंगमात हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) संघाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. मागील हंगामात संघाला केवळ ४ सामने जिंकता आले होते. अशातच आता संघाने पुन्हा पांड्यावर संघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे संघ हार्दिक पांड्याच्याच नेतृत्वात आयपीएलचा १८ व्या हंगामात विजेतेपद जिंकू शकेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.



संघाची जर्सी निळ्या आणि सोनेरी रंगछटेतील असून मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर करत जर्सीचे अनावरण केले आहे. “प्रिय पलटण, आम्हाला माहित आहे की गेल्यावर्षीचा हंगाम विसरण्यासारखा होता. पण नव्या हंगामात कसं खेळायचं आपल्यावर अवलंबून आहे. तो चांगला ठरवण्याची संधी आहे. वारसा पुढे नेण्यासाठी २०२५ ही आपली संधी आहे. आम्ही मुंबई संघ असल्यासारखे मैदानात खेळू, ही फक्त आमची जर्सी नाही, तर हे तुम्हाला दिलेलं वचनही आहे. चला वानखेडेवर भेटू,” असा भावनिक मेसेज हार्दिक पांड्याने दिला आहे.


आयपीएल २०२५ चा उद्घाटन सामना येत्या २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाणार आहे. त्यांनतर दुसऱ्या दिवशी २३ मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज असा सामना सुरु होणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण