Mahashivratri : महाशिवरात्रीआधी होणार मंगळ ग्रहाचं परिवर्तन! 'या' राशींवर घोंघावणार संकट

  65

मुंबई : प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशींमध्ये परिवर्तन करतो. याचा प्रभाव काही राशींवर चांगला किंवा वाईट पडतो. येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (Mahashivratri 2025) साजरी केली जाणार आहे. मात्र त्याआधीच 'मंगळ' ग्रहांचा सेनापती मिथुन राशीत परिवर्तन करणार आहे. परंतु याचा काही राशींवर (Zodic signs) वाईट परिणाम होणार आहे. ज्योतिए शास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळाचे हे भ्रमण सोमवारी सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी थेट गतीने मिथुन राशीत जाणार आहे. हा प्रभाव ५ राशींसाठी हानिकारक असणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.



वृषभ राशी


वृषभ राशीच्या दुसऱ्या, पाचव्या, आठव्या आणि नवव्या घरावर मंगळाचा परिणाम होणार आहे. या परिणामाच वृषभराशीच्या लोकांच्या उत्पन्नावर आणि बोलण्यावर होईल. विवाहित लोकांनी मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांसमोर आपले बोलणे नियंत्रणात ठेवावे. तसेच घरगुती कलह होण्याची दाट शक्यता आहे.



कर्क


कर्क राशीत जन्मलेल्या लोकांना मंगळ थेट मिथुन राशीत गेल्याने प्रभावित होईल. या लोकांच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना घरापासून लांब अंतरावर बदलीचा सामना करावा लागू शकतो. मंगळाची दृष्टी ७ व्या घरात असल्याने आरोग्य बिघडू शकते आणि वाढत्या खर्चामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.



तुळ


मिथुन राशीत मंगळ थेट आल्याने तूळ राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. या लोकांना प्रवास करावा लागू शकतो. ज्यामुळे अनावश्यक खर्च होईल. घरात आणि कुटुंबात तणावाचे वातावरण असेल, म्हणून संयमाने वागा. तसेच आरोग्याकडे विशेष काळजी देणे गरजेचे असेल.



वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ थेट येणे शुभ राहणार नाही. या लोकांच्या कुंडलीच्या आठव्या भागात मंगळ ग्रहाचा प्रभाव राहील. यामुळे जीवनात अनिश्चितता येईल. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या वादांमुळे नुकसान होईल, म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.



धनु


धनु राशीच्या सातव्या घरात मंगळाचे भ्रमण अनेक आव्हाने निर्माण करेल. या लोकांच्या वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होणार आहे. करिअरमध्ये कामाचा ताण येऊ शकतो. आक्रमकता आणि वर्चस्ववादी वर्तन तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.


(अस्वीकरण : वरील दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रांच्या आधारे दिली आहे. 'प्रहार' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग