Mahashivratri : महाशिवरात्रीआधी होणार मंगळ ग्रहाचं परिवर्तन! 'या' राशींवर घोंघावणार संकट

मुंबई : प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशींमध्ये परिवर्तन करतो. याचा प्रभाव काही राशींवर चांगला किंवा वाईट पडतो. येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (Mahashivratri 2025) साजरी केली जाणार आहे. मात्र त्याआधीच 'मंगळ' ग्रहांचा सेनापती मिथुन राशीत परिवर्तन करणार आहे. परंतु याचा काही राशींवर (Zodic signs) वाईट परिणाम होणार आहे. ज्योतिए शास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळाचे हे भ्रमण सोमवारी सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी थेट गतीने मिथुन राशीत जाणार आहे. हा प्रभाव ५ राशींसाठी हानिकारक असणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.



वृषभ राशी


वृषभ राशीच्या दुसऱ्या, पाचव्या, आठव्या आणि नवव्या घरावर मंगळाचा परिणाम होणार आहे. या परिणामाच वृषभराशीच्या लोकांच्या उत्पन्नावर आणि बोलण्यावर होईल. विवाहित लोकांनी मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांसमोर आपले बोलणे नियंत्रणात ठेवावे. तसेच घरगुती कलह होण्याची दाट शक्यता आहे.



कर्क


कर्क राशीत जन्मलेल्या लोकांना मंगळ थेट मिथुन राशीत गेल्याने प्रभावित होईल. या लोकांच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना घरापासून लांब अंतरावर बदलीचा सामना करावा लागू शकतो. मंगळाची दृष्टी ७ व्या घरात असल्याने आरोग्य बिघडू शकते आणि वाढत्या खर्चामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.



तुळ


मिथुन राशीत मंगळ थेट आल्याने तूळ राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. या लोकांना प्रवास करावा लागू शकतो. ज्यामुळे अनावश्यक खर्च होईल. घरात आणि कुटुंबात तणावाचे वातावरण असेल, म्हणून संयमाने वागा. तसेच आरोग्याकडे विशेष काळजी देणे गरजेचे असेल.



वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ थेट येणे शुभ राहणार नाही. या लोकांच्या कुंडलीच्या आठव्या भागात मंगळ ग्रहाचा प्रभाव राहील. यामुळे जीवनात अनिश्चितता येईल. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या वादांमुळे नुकसान होईल, म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.



धनु


धनु राशीच्या सातव्या घरात मंगळाचे भ्रमण अनेक आव्हाने निर्माण करेल. या लोकांच्या वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होणार आहे. करिअरमध्ये कामाचा ताण येऊ शकतो. आक्रमकता आणि वर्चस्ववादी वर्तन तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.


(अस्वीकरण : वरील दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रांच्या आधारे दिली आहे. 'प्रहार' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Comments
Add Comment

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी