GBS Patient : सांगली जिल्ह्यात 'जीबीएस'चा पहिला बळी

  115

सांगली : सांगलीतील महापालिका क्षेत्रात गुईलेन बॅरी सिंड्रोम रुग्णाचा मृत्यू झाला.येथील खणभागातील ३६ वर्षीय तरुणाला गेल्या आठवड्यात उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर आता मनपा आरोग्य विभागाकडून खणभागात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला खणभाग येथील एका तरुणाच्या हाता-पायाचे स्नायू कमकुवत झाल्याने अशक्तपणा आला होता. त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १९ रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याला जीबीएसची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी (ता. २१) मृत्यू झाला. दरम्यान, मिरज शासकीय रुग्णालयात यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्ती या परजिल्ह्यातील होत्या. त्यामुळे सांगलीतील हा पहिला बळी ठरला आहे.आरोग्य विभागाने खणभागात सर्वेक्षणाची एक फेरी पूर्ण केली आहे. नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.



आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात जीबीएसने थैमान घातले आहे. काहींना प्राणदेखील गमवावे लागले आहेत. सांगलीत देखील जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहेत. २८ जानेवारीला चिंतामणीनगर येथे जीबीएसचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर विश्रामबाग, संजयनगरमध्येदेखील रुग्ण आढळून आले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या