GBS Patient : सांगली जिल्ह्यात 'जीबीएस'चा पहिला बळी

  93

सांगली : सांगलीतील महापालिका क्षेत्रात गुईलेन बॅरी सिंड्रोम रुग्णाचा मृत्यू झाला.येथील खणभागातील ३६ वर्षीय तरुणाला गेल्या आठवड्यात उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर आता मनपा आरोग्य विभागाकडून खणभागात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला खणभाग येथील एका तरुणाच्या हाता-पायाचे स्नायू कमकुवत झाल्याने अशक्तपणा आला होता. त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १९ रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याला जीबीएसची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी (ता. २१) मृत्यू झाला. दरम्यान, मिरज शासकीय रुग्णालयात यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्ती या परजिल्ह्यातील होत्या. त्यामुळे सांगलीतील हा पहिला बळी ठरला आहे.आरोग्य विभागाने खणभागात सर्वेक्षणाची एक फेरी पूर्ण केली आहे. नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.



आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात जीबीएसने थैमान घातले आहे. काहींना प्राणदेखील गमवावे लागले आहेत. सांगलीत देखील जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहेत. २८ जानेवारीला चिंतामणीनगर येथे जीबीएसचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर विश्रामबाग, संजयनगरमध्येदेखील रुग्ण आढळून आले.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली