Crane Falls : रायते पुलावरील भीषण अपघातात उल्हास नदीत कोसळली क्रेन

प्रवासी सुरक्षेसह वाहतूक प्रश्न ऐरणीवर


कल्याण : कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळील उल्हास नदीच्या पुलावरून एक अवजड क्रेन नदीत कोसळली. मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले. प्रवीण चित्ता आणि नजरहुसेन शेख यांना तातडीने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. जीवितहानी टळली असली तरी या अपघातामुळे वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


कल्याण-मुरबाड मार्गाचे नूतनीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शहाड उड्डाणपुलापासून म्हारळपाड्यापर्यंतच्या भागातील काम पूर्ण झाले असले तरी त्यावेळीही नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अपघातांची मालिका सुरूच असून, काहींनी आपले प्राण गमावले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.



या मार्गावरील कामाच्या दर्जाबाबत मोठ्या तक्रारी असून, ठेकेदाराने अत्यंत हलगर्जीपणा केला आहे. कुठेही योग्य दिशा दर्शक फलक नाहीत, संरक्षक कठडे नाहीत, रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले असून, प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पत्र्याच्या तात्पुरत्या कुंपणाला केवळ कागदी पट्ट्या बांधून जबाबदारी झटकली जात आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. खड्डेमय रस्ते, वाहतुकीची वर्दळ आणि अपुऱ्या सुविधा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रायते पुलावर झालेल्या अपघाताने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित होत असल्याचे दिसून येत आहे.


या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून प्रशासन आणि ठेकेदार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत, अन्यथा जबाबदारी कोणाची? हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

Comments
Add Comment

ऐन थंडीत फटाफट पैसे कमावण्याची सुवर्णसंधी! हमखास चालतील असे बिझनेस 

राज्यात सर्वत्र गुलाबी थंडीचे चाहूल लागली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्येही थंडीच्या दिवसात लागणारे स्वेटर,

जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि

वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, मिळेल श्रीविष्णूचा आशीर्वाद

मुंबई : कार्तिकी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी होणारी वैकुंठ चतुर्दशी यंदा ४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार

क्षितिज पटवर्धन पहिल्यांदाच दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

आई - मुलाच्या गोष्टीत झळकणार लोकप्रिय कलाकार मुंबई : जन्माच्या आधीपासूनच आपल्या आईशी आपलं नातं जुळलेलं असत. आई

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६