न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी तिसरी अटक

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी तिसरी अटक झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू मौन यांना अटक केली. ते डिसेंबर २०२४ पर्यंत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. मौन यांनी सह-आरोपी हितेश मेहता यांच्याकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.



न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात बँकेचे माजी महाव्यवस्थापक अकाउंट्सचे प्रमुख हितेश मेहता आणि रिअल इस्टेट डेव्हलपर धर्मेश पौण यांना आधीच अटक झाली आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू मौन यांना अटक झाली आहे. यामुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील अटकेतल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे.



मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याशी संबंधित तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.



शुक्रवारी दादर पोलिस ठाण्यात बँकेच्या कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधून १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पोलिसांनी अभिमन्यू मौन, हितेश मेहता आणि धर्मेश पौण या तीन जणांना अटक केली आहे.

रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक नवी खाती उघडू शकत नाही. नव्या ठेवी ठेवून घेऊ शकत नाही. तसेच बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांना थकीत कर्जांच्या वसुलीच्या प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण