Palghar : ‘तलासरीत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ नाही’

तलासरी  : पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देशात लाखो गोरगरिबांना घरे देण्याचा कार्यक्रम सुरू असताना, केवळ काही अटींमुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहात आहेत. तलासरी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ एकाही नागरिकाला मिळालेला नाही. त्यामुळं या योजनेच्या अटी आणि नियम शिथिल करावेत, अशी मागणी नगरसेवक आणि भाजपाचे शहराध्यक्ष सुरेंद्र निकुंभ यांनी पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. निकुंभ यांनी यापूर्वी वारंवार याबाबत आवाज उठवला आहे.



शासनाशी पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतु, अद्याप त्यांच्या पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तलासरी नगरपंचायतीमधील हद्दीत सर्व आदिवासी नागरिक राहतात. त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी नाहीत. ज्यांच्याकडं जमिनी आहेत, त्या वर्ग दोनच्या असल्यानं तेथेही निवासस्थान मिळत नाही. त्यामुळं या योजनेच्या अटी शिथिल करून, वर्ग दोन जमिनी असतील किंवा कच्चं घर असूनही घरपट्टी असेल तर अशा लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यातील अटी शिथिल करण्याची मागणी निकुंभ यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Comments
Add Comment

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र