दहावीच्या पेपरपूर्वीच विद्यार्थिनीचा रेल्वे ट्रॅकजवळ संशयास्पद मृतदेह आढळला

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आसनगाव ते वाशिद रेल्वे स्थानकादरम्यान एका विद्यार्थिनीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी डोंबिवलीतील एका शाळेत दहाव्या इयत्तेत शिकत होती. शालांत परीक्षेच्या आधी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


एकीकडे विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे तिच्या माता-पित्याने आकांत केला आहे. तर दुसरीकडे या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही मुलगी पश्चिम डोंबिवलीच्या भोपर परिसरात राहत असल्याची माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे.



लोकलमधून पडून या मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा जगताप असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. १६ वर्षीय आकांक्षा डोंबिवलीतल्या एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. २१ फेब्रुवारी रोजी तिचा पहिला पेपर होता. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांना आसनगाव-वाशिंद या स्थानकांच्या दरम्यान रेल्वेच्या रूळाशेजारी आढळला.

Comments
Add Comment

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला

म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या

राज्यातील कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जास्तीत जास्त कापूस सरकारी दराने खरेदी केला जावा,

सहकार क्षेत्र अधिक गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवे सहकार धोरण; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : सहकार क्षेत्र हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे मॉडेल आहे. राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल - मुख्यमंत्री

मुंबई : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनमतातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणात संशयित तीन