साखरेच्या किंमती वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मागील एका महिन्यात भारतातील साखरेच्या किंमतीत ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खराब हवामान आणि साखर निर्यातीमुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला असून साखरेच्या किंमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. साखर हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याने येणाऱ्या काही महिन्यात साखर महागणार असल्याचे सांगण्यात येते.

उद्योगाच्या अंदाजानुसार असे दिसून आले आहे की, १५ फेब्रुवारीपर्यंत भारताचे साखर उत्पादन दरवर्षी पेक्षा १२ टक्क्यांनी घटले आहे. प्रतिकूल हवामान आणि दोन वर्षानंतर साखर निर्यात पुन्हा सुरू झाल्याने साखर उत्पादनात कमतरता निर्माण झाली आहे. तसेच साखरेच्या उत्पादनात घट झाल्यामुळे साखर पुरवठा कमतरता निर्माण झाली आणि साखरेच्या किंमती वाढवल्या.कमी ऊस उपलब्धता आणि साखर कारखाने लवकर बंद झाल्यामुळे साखरेच्या किंमतीवर परिणाम झाला होता.
ऑक्टोबर ते मे अथवा जूनपर्यंत म्हणजे ४ ते ६ महिने सुरू असतात. यावर्षी उसाच्या तुटवड्यामुले यापूर्वीच बहुतांश साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्यावर्षी ५०५ साखर कारखान्याच्या तुलनेत यंदा केवळ ४५४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू सुरू केले. १ फेब्रुवारीपर्यंत उसाअभावी ७७ साखर कारखाने बंद झालेत तर मागील वर्षी केवळ २८ साखर कारखाने बंद झाले होते. याच काळात गेल्यावर्षी ४७७ कारखाने सुरू होत, तर सध्या ३७७ साखर कारखान्यांचा गाळीत हंगाम अद्याप सुरू आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत बंद झालेले बहुतेक साखर कारखाने महाराष्ट्र आणि कर्नाटक या भारतातील दोन शुगर उत्पादक राज्यांतील आहेत. एनएफसीएसएफ आणि भारतीय साखर आणि बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यासह,काही उद्योग संस्थांनी मागील वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एनएफसीएसएफच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १९७.६५ लाख टन होते. गेल्यावर्षी याच तारखेला २२४.७५लाख टन होते, असे देखील नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीने स्पष्ट केले आहे
Comments
Add Comment

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक

BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर,

Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक

NEET-UG 2026 : पेपरफुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली, आता पुढे काय होणार ?

नवी दिल्ली : पेपरफुटी झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी रविवार ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली 'नीट' (NEET-UG

NEET UG 2026 : 'नीट' पेपर फुटीचं केरळ कनेक्शन! ४२ तास आधीच फुटला होता पेपर; परीक्षा अखेर रद्द; सीबीआय करणार चौकशी

२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक

Assam Himanta Biswa Sarma Oath : आसाममध्ये पुन्हा 'बिस्वा'राज! हिमंत बिस्वा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुवाहाटी : आसामच्या राजकीय इतिहासात मंगळवारी (१२ मे) एका नव्या पर्वाची नोंद झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता